शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंची कमाल! ‘या’ गावात सभा घेतली, तिथेच बिनविरोध सत्ता आणली; शिंदे गटाला दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 3:53 PM

Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे गटाला धक्का बसला असून, आदित्य ठाकरेंची जादू चालल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून  राज्यभर दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मात्र, यातच आता आदित्य ठाकरेंनी सभा घेतलेल्या एका गावात शिवसेनेला दणकून फायदा झाला आहे. ज्या गावात आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली होती, त्याच गावात शिवसेनेची बिनविरोध सत्ता आली आहे. 

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, या मंत्रिमंडळात पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांना संधी मिळाली आहे. मात्र, दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून धक्का बसला आहे. भुमरे यांच्या मतदारसंघातील ज्या गावात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली होती, त्या गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर शिवसेनेचे १३ पैकी १३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.  

संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची 'शिव संवाद यात्रा'

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातून आधी निष्ठा यात्रा आणि नंतर शिव संवाद यात्रा काढत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसत आहे. पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातील बिडकीन गावात सुद्धा आदित्य ठाकरेंची शिव संवाद यात्रा होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सभा घेत जनतेशी संवाद साधला होता. त्यांनतर या गावात झालेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाने संपूर्ण उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याचा दावा केला आहे. शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

दरम्यान, बिडकीन गावात शिवसेनेला सत्ता मिळाली असली तरीही, गेल्या आठवड्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भुमरे यांना एकहाती सत्ता मिळाली आहे. पैठणमध्ये एकूण ७ ग्रामपंचायतसाठी निवडणूक झाली होती. तर सातपैकी ६ ग्रामपंचायतवर भुमरे यांचे वर्चस्व पाहायला मिळाले. तर पैठण तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत भुमरे यांच्या ताब्यात आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याने तालुक्यात ताकद वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे