शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

वैतरणा धरण क्षेत्रात बांगलादेशींकडून रेतीउपसा; ५० हून अधिक कामगार कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 4:36 AM

रोज शेकडो ब्रास रेती उत्खनन करून विकासकांना चढ्या भावात विक्री केली जात आहे.

- शाम धुमाळ कसारा : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात रेतीउपसा सुरू आहे. ही उपसा करण्यासाठी बांगलादेशी कामगार याठिकाणी काम करत आहेत. धरणांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पालिकेने अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करूनही येथे बांगलादेशींनी घुसखोरी केल्यामुळे धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भातसा, तानसा, वैतरणा धरणांपैकी सध्या वैतरणा धरणातून बोटी व सक्शन पंपाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात रेतीउपसा सुरू आहे. रेती काढण्यासाठी तब्बल ५० हून अधिक बांगलादेशी कामगार येथे काम करत आहेत. धरणातच बोटी उतरवून रेती काढली जाते. डिझेलवर या बोटी चालवल्या जात असल्याने धरणातील पाण्यावर तेलाचा तवंग पसरून पाणी दूषित होऊन मासे मृत्यूमुखी पडत आहेत. बेकायदासुरू असलेल्या या रेती उपशामुळे धरणाच्या पातळीत घट होत आहे.

रोज शेकडो ब्रास रेती उत्खनन करून विकासकांना चढ्या भावात विक्री केली जात आहे. सरकारचा लाखोंचा महसूल बुडवणाऱ्या रेतीमाफियांवर कारवाईसाठी महसूल विभागाने अनेकदा प्रयत्न केले. परंतु जंगल व अंधाराचा फायदा घेत हे माफिया पळून जातात. या दरम्यान या रेती चोरांविरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पालिका, महसूल, वनविभाग व पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी स्थानिकांकडून होत असून बांगलादेशी कामगारांची चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहेत.

हमारा सेठ पैसा देता है...

दरम्यान, रेती उपसा करून विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकास हटकले असता ‘हमारा सेठ सब को पैसा देता हेै’ असे उत्तर दिले व रेतीने भरलेली गाडी जोरात नेली. रेती उपसा करून वनविभागाच्या जागेतून वाहतूक करणाऱ्या रेतीमाफियांना वनविभाग अभय देत असल्याने रेती माफियांची हिंमत वाढली आहे. डोळ्यासमोर रेतीउपसा होत असताना मुंबई पालिकेचे अधिकारी, कर्मचारी झोपेचे सोंग घेत आहेत.

वैतरणा धरणाच्या जंगलात रेतीच्या गाड्या व बोटी पकडण्यासाठी आम्ही लवकरच ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेऊन कारवाई करणार आहोत. या अगोदर अनेकवेळा रेतीच्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच वैतरणा धरणातील रेतीउपसा करणाºयाविरोधात टेम्भे ग्रामपंचायतीला येथे विशेष ग्रामसभा घेऊन वाळू माफियांविरोधात जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.- नीलिमा सूर्यवंशी, तहसीलदार, शहापूर

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVasai Virarवसई विरारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीIndiaभारतWaterपाणी