शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

विधान परिषदेच्या आश्वासनावर भाजपवासी झालेल्या आयारामांची कारकिर्द पणाला !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 3:45 PM

राज्यात निर्माण झालेल्या महाविकास आघाडीमुळे विधान परिषदेसाठी इच्छूक असलेल्या नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाली. या इनकमिंगला मेगा भरती असं नावही देण्यात आलं होतं. विरोधी पक्षांचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपने काठावर असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन आपली ताकद वाढवली. मात्र ही ताकद सत्तास्थापनेसाठी भाजपला पुरेशी ठरली नाही. मात्र जे नेते मंत्रीपदाच्या किंवा विधान परिषदेच्या आश्वासनांवर भाजपमध्ये दाखल झाले, त्यांची राजकीय कारकिर्द धोक्यात आली आहे. 

भाजपचीच सत्ता येणार असे ओपिनियन पोल आल्यानंतर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील 30 हून अधिक मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांचा समावेश होता. तर काही नेते पक्षात मोठ्या पदावर होते. या सर्व नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपने राज्यात वर्चस्व निर्माण केले होते. 

विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने आयारामांना विधान परिषदेचे आश्वासन दिले होते. तर नाराजांना देखील हेच आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे  भाजपमधून तिकीटासाठी बंडखोरी झाली नाही. जी काही बंडखोरी झाली, ती शिवसेनेला दिलेल्या मतदारसंघात झाली होती. दरम्यान विधानसभा निवडणुकीत सबुरीने घेणाऱ्या नेत्यांना विधान परिषदेचे वेध लागले. त्यानुसार या नेत्यांची तयारी होती. यापैकी अनेक नेते दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. मात्र राज्यात निर्माण झालेल्या महाविकास आघाडीमुळे विधान परिषदेसाठी इच्छूक असलेल्या नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. 

2020 मध्ये विधान परिषदेच्या 26 जागा रिक्त होणार आहे. शिवसेना-भाजपची युती असती तर यातील किमान 13 जागा भाजपच्या वाट्याला येणार होत्या. मात्र आता सर्वच राजकीय समिकरण बदलले आहे. याचा लाभ शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या इच्छूकांना होणार असून विधान परिषदेवर निवडून येण्याची खात्री झाली आहे. तर भाजपकडून विधान परिषदेच्या आश्वासनांवर विधानसभेत गप्प बसलेल्या नेत्यांची राजकीय कारकिर्द पणाला लागली आहे.