शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅटो हब’ नागपुरातच व्हावा

By admin | Updated: December 24, 2014 00:48 IST

रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेला ‘आॅटो हब’ नागपुरात स्थापन व्हावा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. ही मागणी सर्वप्रथम लोकमत

विजय दर्डा यांच्या मागणीचे समर्थन : इंटकची २८ पासून जनजागृती मोहीमनागपूर : प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेला ‘आॅटो हब’ नागपुरात स्थापन व्हावा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. ही मागणी सर्वप्रथम लोकमत समूहाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी देशभरातील आॅटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित उद्योजक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दर्डा यांच्या मागणीचे समर्थन इंटकचे संघटन सचिव राजेश निंबाळकर यांनी केले असून या मुद्यावर इंटकचे कार्यकर्ते २८ डिसेंबरपासून विशेष जनजागृती अभियान राबविणार आहेत.निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील सातही विभागात सुरू असलेल्या आॅटोमोबाईल उद्योगांची माहिती एमआयडीसीचे अधिकारी आणि विविध कामगार संघटनांकडून जाणून घेतली. विदर्भात सहायक कंपन्या नसल्याचे कारण पुढे करून देशातील नामांकित आॅटोमोबाईल उद्योजकांनी अन्य ठिकाणी उद्योग स्थापन केले आहेत. सध्या पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बारामती, ठाणे या जिल्ह्यांमध्ये हजारो युवकांना रोजगार देणारे मोठे उद्योग सुरू आहेत. या उद्योगांवर आधारित सुरू असलेल्या सहायक उद्योगांमध्ये पुणे येथे ४६, नाशिक ९३, कोल्हापूर १३७, औरंगाबाद ५०, बारामती १२, ठाणे येथे ३० आॅटो निर्मिती उद्योग गेल्या २० ते २५ वर्षांपासून यशस्वीरीत्या सुरू आहेत. याउलट विदर्भात ट्रॅक्टर कंपनी आणि अशोक लेलँड ट्रकच्या सहायक युनिटसह केवळ सहा उद्योग सुरू असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शासनाची असमतोल भूमिकागेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाची असमतोल भूमिका आहे. विदर्भाकडे दुर्लक्ष केल्याचे सपशेल दिसून येते. रोजगाराचा अधिकार मिळाला पाहिजे. विदर्भात हजारो शिक्षित तरुण बेरोजगार आहेत. त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास खुंटला आहे. शिक्षित तरुण पुणे येथे नोकरीसाठी गेल्याने टेक्निकल अपग्रेडेशन थांबले आहे. नागपूर शहर सोडून अन्य ठिकाणी जाण्याची इच्छा नसलेले इंजिनिअर्स शैक्षणिक पेशात आहेत. त्यांना १० ते १५ हजारांच्या जवळपास पगार मिळतो. विदर्भात मोठ्या आॅटो इंडस्ट्री आणि त्यावर आधारित सहायक कंपन्या असत्या तर येथील तरुण या उद्योगांमध्ये मोठ्या हुद्यावर असते आणि विदर्भाचा विकास झाला असता. १५ ते २० वर्षांत अनेक आॅटो कारखाने निघाले. आम्हाला काहीच माहिती नाही. या वेदना आहेत. नागपूर देशाचे मध्यवर्ती शहरनागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि देशाचे मध्यवर्ती शहर आहे. येथे जागेची उपलब्धता आणि प्रस्तावित उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक घटक आहेत. नागपूर हे रस्ते, रेल्वे आणि विमानमार्गे जोडले आहे. त्यानंतरही उद्योजक नवे उद्योग वा विस्तारीकरण प्रकल्प नागपुरात स्थापन करण्यास उत्सुक नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असून, त्यांना विदर्भाची माहिती आहे. त्यामुळेच विदर्भात आॅटो हब स्थापन व्हावे, अशी अपेक्षा त्यांच्यापासून आहे. नेत्यांनी ताकदीचे आश्वासन द्यावेऔद्योगिक शांतता, राजकीय आणि शासकीय पाठिंब्याचे जो नेता आश्वासन देतो, तिथेच उद्योग सुरू होतात, असा अनुभव असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. नेत्यांमध्ये इच्छाशक्ती असावी, पोकळ आश्वासनांना बगल देताना ताकदीचे आश्वासन देण्याची नेत्यांची भूमिका असावी, तरच विदर्भाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होईल.