शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रूद्रच्या कारनाम्यांबाबत सारेच अनभिज्ञ---आॅन दि स्पॉट रिपोर्ट

By admin | Updated: September 22, 2015 23:58 IST

कुटुंबीय चिंतेत : काराजनगीतही माहिती नाही; गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित-

जयवंत आदाटे- जत ---ना आई-वडिलांना माहिती, ना गावाला कल्पना! तो कोठे आहे, काय करतो, याबद्दल सारेच अनभिज्ञ. कारण सहा-सात वर्षांपासून तो गावातच आलेला नाही. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित रुद्रगोंडा पाटीलची ही कहाणी.      त्याचे नाव रुद्रगोंडा रेवगोंडा पाटील. वय ३२. गाव जत तालुक्यातील काराजनगी. निगडी ते काराजनगीदरम्यान डोंगराळ भागात पाटील वस्ती आहे. तिथेच रुद्रचे घर आहे. साधे कौलारू घर. सारे कुटुंब पूर्णपणे अशिक्षित आणि शेतकरी. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात रुद्रचे वडील रेवगोंडा आप्पासाहेब पाटील (वय ६७), आई रत्नाक्का (६०) यांना काहीही माहीत नाही. रुद्रगोंडाला चार चुलते, पण सगळे स्वतंत्र राहतात. वडिलांसह पाचजणांच्या नावावर १०२ एकर शेतजमीन आहे. परंतु दुष्काळी परिस्थिती व डोंगराळ जमीन असल्यामुळे त्यातून मिळणारे उत्पादन नाममात्रच. आई-वडील पशुपालन व शेती व्यवसाय करून गुजराण करतात. रुद्रगोंडा हा रेवगोंडा यांचा एकुलता एक मुलगा. त्याला जयश्री, सुवर्णा, राजाक्का या बहिणी आहेत. त्यांचे लग्न झाले असून, त्या सासरी असतात. रुद्रचे चुलते चनगोंडा पाटील काराजनगीचे पोलीसपाटील आहेत. आई-वडिलांव्यतिरिक्त रुद्रच्या घरी कोणीही नाही. रुद्रगोंडा, मडगाव बॉम्बस्फोटातील मृत चुलत भाऊ मलगोंडा सिदगोंडा पाटील व चुलते इरगोंडा पाटील हे ‘सनातन’चे साधक. चुलते इरगोंडा यांच्यामुळेच रुद्रगोंडा आणि मलगोंडा ‘सनातन’कडे ओढले गेले. कुटुंबातील या तिघांव्यतिरिक्त इतर कोणीही सनातनचे साधक म्हणून काम करत नाहीत. सेवानिवृत्त शिक्षक असलेले इरगोंडा पाटील ‘सनातन प्रभात’चे जत तालुका बातमीदार म्हणून काम करत आहेत; परंतु पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाडला पोलिसांनी अटक केल्यानंतर तेही जत शहरातून गायब झाले आहेत.रुद्रगोंडाचे पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण काराजनगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, आठवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण निगडी बुद्रुक हायस्कूल येथे व अकरावी आणि बारावीचे शिक्षण शिराळा येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो सांगलीला गेला. त्यादरम्यान त्याने सांगलीत मोबाईल दुरुस्तीचे दुकान सुरू केले होते. सुरुवातीपासून तो सनातनचा साधक म्हणून काम करत होता. सांगलीत गेल्यानंतर तो ‘सनातन’चा कट्टर साधक बनला. २००८च्या दरम्यान त्याने प्रीती या मुलीशी विवाह केला. विवाहानंतर एक-दीड वर्षापर्यंत ते दोघे काराजनगी येथे येत-जात होते. सध्या प्रीती सांगली शहरात वकिली करत असल्याचे त्याचे आई-वडील सांगतात. २००९ मधील मडगाव (गोवा) येथील बॉम्बस्फोटात मलगोंडा पाटील याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी रुद्रगोंडा काराजनगी येथेच होता. स्थानिक आणि गोवा पोलिसांनी त्यावेळी त्याची चौकशी केली होती. त्यानंतर आठ-दहा महिन्यांनी तो काराजनगी येथून बेपत्ता झाला होता. तेव्हापासून तो बेपत्ताच आहे.रुद्रगोंडाच्या आईला मराठी बोलता येत नाही व बोललेले समजतही नाही! त्यांच्यावर कन्नड भाषेचा प्रभाव आहे. रुद्रगोंडाचे रेवगोंडा यांच्या शिधापत्रिकेत नाव नाही. पाटील कुटुंबियांनी मागील चार-पाच वर्षे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सापडला नाही. तो गावात राहत नाही आणि येथे पाच वर्षांत आला नाही आणि येत नाही, असा लेखी दाखला त्याचे चुलते व गावचे पोलीसपाटील चनगोंडा पाटील यांनी जत पोलिसांना दिला आहे. पाटील कुटुंबीय काराजनगीत राहत असले तरी, पोलीसपाटील वगळता घरातील इतरांना गावात कोणीही फारसे ओळखत नाहीत. वर्तमानपत्रातून बातम्या आल्यानंतर ग्रामस्थांना त्यांची माहिती मिळाली. त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली. निगडी आणि काराजनगी या दोन्ही गावांशी रुद्रगोंडाचा संपर्क आला नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल ग्रामस्थांकडून कोणतीही माहितीच मिळत नाही!आम्हाला काहीच माहिती नाही...रुद्रगोंडाचे आई-वडील व चुलते तर म्हणतात, ‘२००९ पासून रुद्रगोंडा बेपत्ता आहे. तो जिवंत आहे की मृत आहे, तेच समजून येत नाही. मग तो हत्या कशी करू शकतो? प्रसारमाध्यमांतून उलट-सुलट बातम्या येत आहेत. कोणी खून केला आहे आणि कोणाचा खून झाला आहे, याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही... हात जोडतो, आम्हाला काही विचारू नका!’