शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

राज्यातील सर्व आमदार अद्याप 'बिनपगारी फुल्ल अधिकारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 12:08 PM

विधान मंडळ कार्यालयाने या संदर्भात माहिती दिली आहे. विधानसभा सदस्यांना आमदारकीची शपथ घेतल्यापासून पगार आणि भत्ते देणे अनुज्ञेय आहे. मात्र आमदारांना अद्याप कोणताही भत्ता किंवा पगार देण्यात आला नसल्याचे विधान मंडळ कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता दोन महिने होतील. मंत्रीपदं निश्चित झाली असली तरी मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. विधानसभा निकालानंतर निर्माण झालेली अभूतपूर्व स्थिती, त्यानंतर लागू झालेली राष्ट्रपती राजवट, 80 तासांच भाजपच सरकार आणि त्यानंतर महाविकास आघाडीची सरशी यामुळे मराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. याचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फटका बसलाच. तर खुद्द आमदार मंडळी यातून वाचू शकली नाही. आमदार झाल्यापासून आमदार बिनपगारी असल्याचे समोर आले आहे. 

विधानसभेतील सर्वच्या सर्व 288 आमदार सध्या तरी बिनपगारी आणि फुल्ल अधिकारी असल्याची स्थिती आहे. अर्थात पूर्णवेळ कारभारी आहेत. धर्माबाद येथील आरटीआय कार्यकर्ते डॉ. एस.एस. जाधव यांनी मागवलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले.  त्यांनी माहितीच्या अधिकारात 288 आमदारांना ऑक्टोबर महिन्यात देण्यात आलेले भत्ते आणि पगार या संदर्भात माहिती मागवली होती. 

विधान मंडळ कार्यालयाने या संदर्भात माहिती दिली आहे. विधानसभा सदस्यांना आमदारकीची शपथ घेतल्यापासून पगार आणि भत्ते देणे अनुज्ञेय आहे. मात्र आमदारांना अद्याप कोणताही भत्ता किंवा पगार देण्यात आला नसल्याचे विधान मंडळ कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे वेतन आणि भत्त्यापासून  आमदार वंचित आहेत. निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागला होता. मात्र शिवसेना आणि भाजपची मैत्री तुटल्याने एक महिना सरकार स्थापन होऊ शकले नव्हते. त्यामुळे आमदारांचा शपथविधी होऊ शकला नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आमदारांचा शपथविधी झाला आहे. मात्र त्यांना अद्याप वेतन आणि भत्ते मिळाले नसून आमदार स्वखर्चातून कामं करत आहेत.