शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे निवृत्ती वृत्ती वय ६२ वर्षे!

By admin | Updated: February 27, 2015 00:27 IST

कुलगुरूंच्या नवृत्तीचे वय ७0 केव्हा करणार, आयसीएआरचा मॉडेल अँक्ट शासनाने गुंडाळला.

अकोला: राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या प्राध्यापक, शास्त्रज्ञांचे नवृत्तीवय ६२ वर्ष करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. कृषी विद्यापीठातील ५0 टक्केपेक्षा जास्त रिक्त असलेल्या पदावर तोडगा म्हणून शासनाने या निर्णयाला बुधवारी मंजुरात दिली आहे. या प्रमाणेच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मॉडेल अँक्टनुसार कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू ंचे नवृत्तीचे वय ७0 वर्ष करणे क्रमप्राप्त असताना मॉडेल अँक्ट मात्र शासनाने गुंडाळला आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. विद्यापीठांच्या स्थापनेपासून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत गेल्याने प्राध्यापक, शास्त्रज्ञांचा ५0 टक्केपेक्षा अधिक अनुशेष या विद्यापीठांमध्ये निर्माण झाला आहे. त्याचे परिणाम मात्र कृषी विद्यापीठांच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यावर होत आहे. या पृष्ठभूमीवर भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे नवृत्तीवय ६२ करण्यासंदर्भात राज्य शासनाला कळवले होते. यासंबंधीचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने शासनाकडे पाठवला होता. शासनाने बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून, २४ फेब्रुवारी २0१५ पासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना हा निर्णय लागू झाला आहे.आयसीएआरने देशातील कृषी विद्यापीठांसाठी मॉडेल अँक्ट लागू केला आहे. या अँक्टनुसार देशातील सर्व कृषी विद्यापीठांची कार्यपद्धती सारखी असावी, यासाठीची तरतूद केली आहे. या अँक्टनुसार कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूं चे नवृत्तीचे वय ७0 वर्ष असावे, यासाठी आयसीएआरने राज्यशासनाला पत्र दिलेले आहे. कृषी विद्यापीठांना स्वायत्ता देण्यासंबंधीची या मॉडेल अँक्टमध्ये तरतूद आहे. देशातील इतर राज्यात कुलगुरूं ची सेवानवृत्तीची वयोर्मयादा ७0 करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने शासनला शिफारस केली आहे. पण राज्यशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू ंचा कार्यकाळ संपला आहे. पण अनुभव आणि कृषी विद्यापीठांचा विविध पदावर काम केलेली योग्य व्यक्ती मिळत नसल्याने या विद्यापीठाला कुलगुरू मिळणे कठीण झाले आहे. या पृष्ठभूमीवर या राज्यातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू लवकरच राज्यपाल, मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना भेटणार आहेत.महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ तुकाराम मोरे यांनी कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापकांचे नवृत्तीवय ६२ वर्ष केले आहे. अत्यंत चांगला निर्णय झाला असल्याचे सांगीतले. तसेच कुलगुरूचे नवृत्तीवय ७0 वर्ष करण्याची गरजही व्यक्त केली.