शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘इनकमिंग’वर कार्यकर्ते नाराज

By admin | Updated: September 10, 2014 09:13 IST

भारतीय जनता पार्टीमध्ये अन्य पक्षांमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर असलेला फिल्टर काढून घेण्यात आल्यावर परपक्षांतून लोंढे येऊ लागल्याने भाजपाचा मूळ कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे.

भाजपा : पक्षात अस्वस्थता, एकनाथ खडसेंनी दिली कबुली!संदीप प्रधान, मुंबईभारतीय जनता पार्टीमध्ये अन्य पक्षांमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर असलेला फिल्टर काढून घेण्यात आल्यावर परपक्षांतून लोंढे येऊ लागल्याने भाजपाचा मूळ कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे. गेली पंधरा वर्षे सत्ता उपभोगलेल्यांच्या पालख्या  पुढील पाच वर्षे उचलाव्या लागणार असतील तर अशी सत्ता येऊन काय कामाची, असा सवाल कार्यकर्ते खासगीत करीत आहेत.भाजपामधील अन्य पक्षीयांच्या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याची कबुली खडसे यांनी दिली. मात्र त्या कार्यकर्त्यांचे प्रमाण नगण्य असल्याचा दावा केला. ज्या मतदारसंघात भाजपाची परि स्थिती मजबूत नाही. जेथे गेल्या २५ वर्षांत पक्षाचा आमदार निवडून आलेला नाही अशा ठिकाणी पर पक्षातून प्रवेश दिले जात आहेत, असे ते म्हणाले. शिवाय पक्षात प्रवेश करणाऱ्यांपैकी केवळ एक-दोघांचा अपवाद वगळता इतरांना उमेदवारी नको आहे, असे ते म्हणाले.खडसे यांचा दावा काहीही असला तरी अन्य पक्षातून येणारी मंडळी ही एकतर भाजपाचे सरकार आल्यास वेगवेगळ््या यंत्रणांकडून संरक्षण मिळावे याकरिता किंवा त्यांच्या सहकार क्षेत्रातील संस्थांना आर्थिक लाभ मिळत राहावा याकरिता येत आहेत,असे कार्यकर्त्यांचे मत आहे. गावित, पाचपुते यांना पक्षात घेतल्याने कदाचित ते दोन-चार मतदारसंघ भाजपाकडे येतील. मात्र अन्यत्र त्यांच्या प्रवेशाचा फटका बसणार नाही याची काय खात्री, असा सवाल कार्यकर्ते करीत आहेत. प्रवेश करणाऱ्या काहींनी कुठलीही उमेदवारी मागितली नसली तरी भविष्यात राज्यसभा, विधान परिषद, महामंडळांची अध्यक्षपदे यावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून येणारी ही मंडळी दावा करणार. अशावेळी भाजपातील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विचार होणार की नाही, अशी चिंता कार्यकर्ते खासगीत व्यक्त करीत आहेत. फ्री इनकमिंग सुरूच !वादग्रस्त माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांच्याबरोबर किमान ३५ जणांना भाजपाने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश दिला. त्यानंतर मंगळवारी जावळीचे माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, उस्मानाबादचे माजी खासदार शिवाजीराव कांबळे, भारिपच्या उज्ज्वला जाधव आदींनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.पुन्हा तेच होणार का ?राज्यात पुलोदचे सरकार होते तेव्हा व शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते तेव्हाही अनेक मंडळी पक्षात आली होती. त्यांनी मंत्रीपदे, राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतली होती. तेच पुन्हा घडणार असेल तर सत्ता येऊनही गेली पंधरा वर्षे संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचे काय होणार, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.