शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 06:46 IST2025-10-18T06:43:05+5:302025-10-18T06:46:15+5:30

सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसानभरपाई सरकारकडून जाहीर...

A ray of hope for farmers 21 lakh farmers in the state will be allocated Rs 1356 crore | शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप

शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप


मुंबई : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी १३५६ कोटी ३० लाख २२ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

तसेच, जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजारांच्या मदतीसही मान्यता देण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरित होईल. 
मकरंद जाधव-पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री

सप्टेंबरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अशी मिळेल मदत 
जिल्हा    शेतकरी     बाधित क्षेत्र (हेक्टर)    मदत (रुपये)
सातारा    ११,११३     ४.२१९.२८         ६.२९ कोटी
कोल्हापूर     ५,८६०     १,६९६.३६     ३.१८ कोटी 
बीड     ८,०६,५१३     ६,४४,९१८.५५     ५७७.७८ कोटी 
धाराशिव     ४,०४,६५६     ३,११,२९१.२३     २९२.४९ कोटी 
लातूर     ४,१५,४९२     २३,०६,६२८.९९     २०२.३८ कोटी 
परभणी     ४,३९,२९७     २,८५,८५३.७८     २४५.६४ कोटी 
नांदेड     ८३,२६७     ३२,०७३.०२     २८.५२  कोटी 

जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई
अमरावती विभाग : अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांतील ७,८८,९७४ शेतकऱ्यांच्या ६,५४,५९५.४२ हेक्टरवरील नुकसानीपोटी ५६५ कोटी ६० लाख ३० हजारांच्या मदतीस मान्यता.

नागपूर विभाग : गोंदिया, भंडारा, वर्धा गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांतील  ३७,६३१ शेतकऱ्यांच्या २१,२२४.६४ हेक्टरवरील नुकसानीपोटी २३ कोटी ८५ लाख २६ हजारांच्या मदतीस मान्यता.

पुणे विभाग : कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या ८ हजार ८३५.१५ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १४ कोटी २८ लाख ५२ हजारांच्या मदतीस मान्यता.

छ. संभाजीनगर विभाग : हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील १० लाख ३५ हजार ६८ शेतकऱ्यांच्या  ८ लाख ४८ हजार ४४५.३७  हेक्टरवरील नुकसानीपोटी ७२१ कोटी ९७ लाख ८६ हजारांच्या मदतीस मान्यता.

नाशिक विभाग : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहिल्यानगर जिल्ह्यांतील २४ हजार ६७७ शेतकऱ्यांच्या १२ हजार १४९.४६  हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १३ कोटी ७७ लाख ३१ हजारांच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.

Web Title : किसानों के लिए उम्मीद: 21 लाख किसानों को ₹1356 करोड़ की सहायता

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने सितंबर और जुलाई-अगस्त 2025 में भारी बारिश और बाढ़ से प्रभावित किसानों के लिए ₹2695.79 करोड़ की सहायता मंजूर की। कई जिलों के 40 लाख से अधिक किसानों को वित्तीय राहत मिलेगी, जो सीधे जिला स्तर पर वितरित की जाएगी।

Web Title : Hope for Farmers: ₹1356 Crore Aid for 21 Lakh Farmers

Web Summary : Maharashtra approves ₹2695.79 crore aid for farmers affected by heavy rains and floods in September and July-August 2025. Over 40 lakh farmers across multiple districts will benefit from this financial relief, distributed directly at the district level.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.