शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

८ वर्षांत २४७ पोलिसांच्या आत्महत्या

By admin | Updated: May 4, 2015 01:46 IST

राज्यातील साडेअकरा कोटी जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या राज्य पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता व मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे

जमीर काझी, मुंबईराज्यातील साडेअकरा कोटी जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या राज्य पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता व मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. त्याच्या अतिरेकामुळे गेल्या ८ वर्षामध्ये तब्बल २४७ खाकी वर्दीवाल्यांनी स्वत:च आपल्या आयुष्याचा शेवट करुन घेतला आहे. बहुतांशजणांनी ड्युटीच्या ठिकाणी त्यांना सरंक्षणासाठी दिलेल्या शस्त्राने स्वत:वर गोळी झाडून घेतलेल्या आहेत.आत्महत्या करणाऱ्या पोलिसांमध्ये अधिकाऱ्यांची संख्या ६३ वर आहे. तर उर्वरित कॉन्स्टेबलपासून ते सहाय्यक फौजदारा आहेत. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात ६ जणांनी आयुष्याचा संपविले आहे. शनिवारी रात्री वाकोला पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार दिलीप शिर्के यांनी वरिष्ट निरीक्षक विलास जोशी व त्यांचा आर्डली बाळासाहेब अहिर यांच्यावर गोळी झाडून स्वत: आत्महत्या केली. याप्रकरणामुळे मुंबईसह पुर्ण राज्य पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या आत्महत्याबाबत गृह विभागाकडून माहिती घेतली असता दरवर्षी त्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.वरिष्ठ अधिकारी, सहकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक, ड्युटीवर बंदोबस्त, कामाचा अतिरक ताण, आणि कौटुंबिक कलह ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे त्याबाबत केलेल्या तपासातून पुढे आल्याचे असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.राज्यात सर्वच प्रकारच्या गुन्ह्याच्या आलेख वाढत राहिला आहे. त्याला प्रतिबंधासाठी अद्यावत यंत्रसामुग्रीसह मनुष्यबळ वाढविण्याचे प्रयत्न सरकारकडून एकीकडे होत असताना खात्यातंर्गत संदोपसंदी,गटबाजी वाढत राहिलेली आहे.अवेळी, सलगपणे करावी लागणारी ड्युटी, विविध प्रकारच्या बंदोबस्त हक्कामुळे साप्ताहिक सुट्ठीवर येणारी गदा,वरिष्ट अधिकाऱ्यांची मनमानी, त्रासामुळे अधिकारी,कर्मचाऱ्यांवरील मानसिक तणाव वाढत राहिले आहे.त्याचा परिणाम कुटुंबावर, वैयक्तिक जीवनावर होत आहे. कौटुंबिक कलह वाढल्याने परिणामी रुबाबदार, प्रतिष्टेची नोकरीतील उर्वरित सेवा, कुटुंंबाचा विचार न करीत आत्महत्या करण्याची मनोवृत्ती वाढली आहे. गेल्या सव्वा आठ वर्षात म्हणजे जानेवारी २००७ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत २४६ जणांनी आयुष्याचा अंत करुन घेतला आहे. त्यामध्ये उपनिरीक्षक ते आयपीएस दर्जापर्यतच्या ६३ अधिकारी तर कॉन्स्टेबल ते सहाय्यक फौजदारपदापर्यतच्या १८४ जणांनी आयुष्याचा अंत करुन घेतला आहे.