शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या दाखल्यांवर शेरा काय असणार? मुख्याध्यापकांसह विद्यार्थी-पालक संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:13 IST

लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना गुण देऊन दहावीचा निकाल जाहीर ...

लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना गुण देऊन दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरू झाली असून, दाखल काढण्यासाठी विद्यार्थी शाळांमध्ये जात आहेत. मात्र, परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर काय शेरा देणार, याबाबत मुख्याध्यापकांसह विद्यार्थी-पालकांत संभ्रमाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात दहावी परीक्षेसाठी ४० हजार १२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये २२ हजार ७२६ मुले, तर १७ हजार ३९६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दरवर्षी दाखल्यावर परीक्षेचा महिना आणि विद्यार्थ्यांचा आसनक्रमांक नमूद करण्यात येत. मात्र, यावर्षी दहावीची परीक्षाच झाली नाही. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे दाखल्यावर काय शेरा देणार असला प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शिक्षण विभागाकडून याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा...६०३

दहावीतील विद्यार्थी - ४०२८१

उत्तीर्ण विद्यार्थी - ४०१२२

मुले - २२७२६

मुली - १७३९६

मुख्याध्यापक म्हणतात...

कोरोनामुळे दहावीची परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुणांकन करण्यात आले आहे. १६ जुलै रोजी निकाल जाहीर झाला असून, अद्याप गुणपत्रिका प्राप्त झालेल्या नाहीत. त्या प्राप्त झाल्यावरच दाखल्यांचे वितरण केले जाईल.

- जी. एल. जोगदंड

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विद्यार्थ्यांच्या निकालावर शेरा द्यावा का, याबाबत संभ्रम आहे. शिक्षण मंडळाकडून याबाबत पत्र मिळताच त्याप्रमाणे दाखल्यांचे विद्यार्थ्यांना वितरण केले जाईल. निकालपत्र मिळाले नसल्याने दाखला दिलेला नाही.

- गोविंद शिंदे

शिक्षण विभागाच्या निर्णयाची प्रतीक्षा...

दहावीचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला आहे. अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्र मिळालेले नाही. दाखल्यावर काय शेरा द्यावा, याबाबत शिक्षण विभागाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. निर्णय होताच शाळास्तरावर सूचना देण्यात येतील, असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

पालक म्हणतात...

निकाल जाहीर होऊन आठवडा झाला आहे. विद्यार्थ्यांना अद्यापही निकालपत्र मिळालेले नाही. पुुढील प्रवेशासाठी निकालपत्र आणि दाखला महत्त्वाचा आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.

- नंदकुमार थडकर

अकरावी प्रवेशाला सीईटीनंतर सुरुवात होईल. दाखल्यावर काय शेरा देणार याबाबत निर्णय झाला नसल्याचे शाळांच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे निर्णयाची प्रतीक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश लवकर होण्यासाठी निर्णय घेणे आवश्यक आहे.

- प्रकाश आयरेकर