शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ, निराधारांनी काय खायचे? कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:19 IST

लातूर : बाभळगाव रोडवरील ‘आई पार्क’ येथे अनाथ, मतिमंद मुलांना मायेने घास भरवला जातो. या पार्कमध्ये सध्या ६५ ...

लातूर : बाभळगाव रोडवरील ‘आई पार्क’ येथे अनाथ, मतिमंद मुलांना मायेने घास भरवला जातो. या पार्कमध्ये सध्या ६५ मुलं आश्रयाला असून, यातील पाच-सहा मुलं बेड रेस्टवर, तर एक-दोन मुलांना नेहमीच दवाखान्यात न्यावे लागते. अशा या बालगृहाला गेल्या वर्षभरापासून अनुदानच मिळाले नाही. या अनाथ, निराधारांनी काय खावे, असा प्रश्न आहे.

श्री गजानन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संत गाडगेबाबा अनाथ, मतिमंद मुलांचे बालगृह बाभळगाव रोडवरील आई पार्क येथे चालविले जाते. बालकल्याण समितीकडून अर्थात शासनाकडून अनाथ, मतिमंद मुलांना या संस्थेच्या बालगृहात पाठविले जाते. एका मुलाला दोन हजार रुपये वार्षिक अनुदान आहे. शंभर मुलांच्या मान्यता असलेल्या या बालगृहात सध्या ६५ मुलं आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून बालगृहाला शासनाकडून अनुदान मिळाले नाही. शिवाय, दोन वर्षांपासून रेशन अर्थात गहू, तांदूळ देणेही बंद झाले आहे. शासनाकडून अनुदानच न आल्यामुळे संस्था उसनवारीवर या अनाथ, निराधार मुलांचा सांभाळ करीत आहे. संस्थेचे कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या मायेने मुलांचा सांभाळ करतात. पुणे, मुंबई, तसेच अन्य ठिकाणाहून शासनाच्या बालकल्याण समितीकडून अनाथ मुले या संस्थेत आलेली आहेत.

उसनवारीवर अनाथ, मतिमंद मुलांचा सांभाळ

संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहामध्ये बालसमितीकडून आलेल्या मुलांचा सांभाळ केला जातो. या बालगृहातील मुलांना आई-वडील अथवा कोणीही नातेवाईक नाही. अशा मुलांचा सांभाळ संस्था करते. संस्थेनेच या मुलांचे पालकत्व पत्करले आहे. शासनाकडून अनुदान मिळते; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून अनुदान नाही. शिवाय, दोन वर्षांपासून गहू, तांदूळही दिला नाही. त्यामुळे संस्थेला उसनवारी करून मुलांचा सांभाळ करावा लागत आहे. ६५ मुलांपैकी चार-पाच मुलं बेडरेस्टवर आहेत, तर दोन-तीन मुलांना नेहमीच दवाखान्यात न्यावे लागते. अशा परिस्थितीत कोरोनाच्या नावाखाली संस्थेला अनुदान दिले गेलेले नाही. रेशनचा पुरवठाही थांबविलेला आहे. महाराष्ट्रात अनाथ, मतिमंद मुलांचा सांभाळ करणारी ही एकमेव संस्था आहे. तरीही शासनाने अनुदान देण्याकडे कानाडोळा केला आहे. उसनवारीवर अनाथ, मतिमंद मुलांचा सांभाळ

संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहामध्ये बालसमितीकडून आलेल्या मुलांचा सांभाळ केला जातो. या बालगृहातील मुलांना आई-वडील अथवा कोणीही नातेवाईक नाही. अशा मुलांचा सांभाळ संस्था करते. संस्थेनेच या मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. शासनाकडून अनुदान मिळते; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून अनुदान नाही. शिवाय, दोन वर्षांपासून गहू, तांदूळही दिला नाही. त्यामुळे संस्थेला उसनवारी करून मुलांचा सांभाळ करावा लागत आहे. ६५ मुलांपैकी चार-पाच मुलं बेडरेस्टवर आहेत, तर दोन-तीन मुलांना नेहमीच दवाखान्यात न्यावे लागते. अशा परिस्थितीत कोरोनाच्या नावाखाली संस्थेला अनुदान दिले गेलेले नाही. रेशनचा पुरवठाही थांबविलेला आहे. महाराष्ट्रात अनाथ, मतिमंद मुलांचा सांभाळ करणारी ही एकमेव संस्था आहे. तरीही शासनाने अनुदान देण्याकडे कानाडोळा केला आहे.