शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. बारावीची परीक्षा कधी होईल, याबाबत अद्यापही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. बारावीची परीक्षा कधी होईल, याबाबत अद्यापही निर्णय नाही. संचारबंदीमुळे महाविद्यालयेही बंद आहेत. विद्यार्थी नियमित अभ्यास करीत असून, परीक्षेवर पर्याय काय राहील. याबाबत शासन स्तरावर विचार सुरू असला तरी परीक्षा होणार की नाही, या संभ्रमात विद्यार्थी आहेत.

जिल्ह्यात बारावीचे ३४ हजार ५३९ विद्यार्थी आहेत. यामध्ये १८ हजार २०० मुले तर १६ हजार ३४१ मुली आहेत. कोरोनामुळे काही दिवस ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू होता. मध्यंतरी ऑफलाईन वर्ग सुरू झाले. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने महाविद्यालये बंद करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी बारावीचा अभ्यास करीत आहेत. दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये होणारी परीक्षा मे महिना संपत आला तरी झालेली नाही. शासनस्तरावर बारावीच्या परीक्षेबाबत विचारविनिमय सुरू आहे. त्यामुळे परीक्षेवर काय पर्याय निघतो, याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षांबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज पालक, विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.

काय असू शकतो पर्याय

सध्या कोरोनाची परिस्थिती कमी होत आहे. मात्र ऑफलाईन परीक्षा घेणे जिकरीचे ठरू शकते. नीटच्या धर्तीवर विषयनिहाय २०० मार्कांची परीक्षा घेतल्यास निकाल देणे सुलभ होईल. या बाबीचा विचार होणे गरजेचे आहे. - प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे

मे महिना संपत आला तरी बारावी परीक्षेबाबत निर्णय झालेला नाही. ऑफलाईन परीक्षा झाल्या तरी निकाल लागण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा हाच एकमेव पर्याय आहे. याबाबत सकारात्मक विचार व्हावा. - प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे

विद्यार्थी संभ्रमात

गेल्या वर्षभरापासून बारावी परीक्षेची तयारी करीत आहेत. परीक्षा तारीख जाहीर नसल्याने मनात संभ्रम आहे. ऑफलाईन परीक्षा घेणे अशक्य असेल तर ऑनलाईन परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावा. - प्रणव बिडवे, विद्यार्थी

दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये लेखी परीक्षा होत असते. यावर्षी अजूनही परीक्षा झालेली नाही. ऑफलाईन परीक्षा झाल्यानंतर निकाल कधी लागणार, पुढील प्रवेश कसे घेणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घ्यावी. - अमेय कुलकर्णी, विद्यार्थी

कोरोनामुळे वर्ग नियमित झालेले नाहीत. घरीच अभ्यास करतोय. परीक्षेची तारीखही जाहीर झालेली नाही. तात्काळ परीक्षेची तारीख जाहीर करावी. अन्यथा ऑफलाईनचा पर्याय अवलंबवावा. - शिवम बुरांडे, विद्यार्थी.

बारावीचे विद्यार्थी ३४५३९

मुले १८२००

मुली १६३३९