शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत डीपी जळाल्याने तीन तांड्यांचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:18 IST

जळकोट : तालुक्यातील तीन तांड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची विद्युत डीपी जळाल्याने तांड्यातील नागरिकांवर जलसंकट आले आहे. परिणामी, तेथील नागरिकांना ...

जळकोट : तालुक्यातील तीन तांड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची विद्युत डीपी जळाल्याने तांड्यातील नागरिकांवर जलसंकट आले आहे. परिणामी, तेथील नागरिकांना ४- ५ किमीपर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पायांना चटके सोसत नागरिक घागरभर पाण्यासाठी वणवण फिरत असल्याचे दिसून येत आहे.

जळकोट तालुक्यात वाडी- तांड्यांची संख्या अधिक आहे. तालुक्यातील थावरू तांडा, मेघा तांडा आणि रावजी तांडा या तीन तांड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी याेजनांची विद्युत डीपी जळाली आहे. परिणामी, तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. थावरू तांड्याची लोकसंख्या २००, मेघा तांड्याची २००, तर रावजी तांड्याची लोकसंख्या ४०० च्या जवळपास आहे. या तिन्ही तांड्यांवर जवळपास ४ ते ५ हजार पशुधनाची संख्या आहे. मात्र, गेल्या २० दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने तेथील नागरिकांना पिण्यासाठी व पशुधनासाठी फिरावे लागत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे हाल होत आहेत.

विशेष म्हणजे, या तांड्यांवरील नागरिक स्नानासाठी दोन किमी अंतरावर असलेल्या नदीवर जात आहेत. महिलांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. या तांड्यांना वीजपुरवठा करणाऱ्या दोन्ही विद्युत डीपी बंद पडल्या आहेत. १५ दिवस उलटले तरी नवीन डीपी बसविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे तेथील नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने अर्ज, विनंत्या केल्या. परंतु, आश्वासनांशिवाय काहीच पदरात पडत नाही. विशेष म्हणजे, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी बैठकीस महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना करूनही अद्यापही नवीन डीपी बसविण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

घागरभर पाणी मिळेना...

तांड्यास पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत डीपी जळाल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यात याव्यात, अशी वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली. मात्र, अद्यापही दुर्लक्ष होत आहे. घागरभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे तत्काळ नवीन डीपी बसविण्यात यावी, अशी मागणी सरपंच शिरीष चव्हाण यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

डीपी नसल्याने समस्या...

नवीन डीपी बसविण्यासाठी अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर तत्काळ बसविण्यात येईल. गावातील इतर किरकोळ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. डीपी कमी असल्यामुळे विलंब होत आहे. डीपीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे, असे नळगीर येथील साहाय्यक अभियंता तरटे यांनी सांगितले.