शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

१०२ गावांत पाणीटंचाईच्या झळा; ११ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:18 IST

लातूर तालुक्यातील ११, औसा ५, निलंगा ६, रेणापूर १६, अहमदपूर ४२, चाकूर ९, शिरूर अनंतपाळ १, उदगीर ५, तर ...

लातूर तालुक्यातील ११, औसा ५, निलंगा ६, रेणापूर १६, अहमदपूर ४२, चाकूर ९, शिरूर अनंतपाळ १, उदगीर ५, तर जळकोट तालुक्यातील सात गाववाड्यांनी पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर केले आहेत. यापैकी स्थळ पाहणीअंती औसा तालुक्यातील एक प्रस्ताव वगळण्यात आला आहे. तहसील कार्यालयस्तरावर ६८ गावांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. तर, पंचायत समितीस्तरावर ३३ गावांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. दरम्यान, उपविभागीय अधिकारी यांच्याकडून अहमदपूर तालुक्यातील ११ गावांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, सदरील गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ११ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत विंधन विहीर घेणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, विहीर, विंधन विहिरीचे अधिग्रहण करणे, तात्पुरत्या पूरक नळयोजना राबविणे, प्रगतीपथावरील योजना पूर्ण करणे आदी उपाययोजना राबविल्या जात आहेत. अहमदपूर तालुक्यात टंचाईच्या अधिक झळा असून, २४ गावे आणि १२ वाड्यांनी टंचाई निवारणासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. यापैकी २४ प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करण्यात आले आहेत. तर, पंचायत समितीस्तरावर १८ प्रस्ताव प्रलंबित आहेत. तर उपविभागीय अधिकाऱ्यांनी ११ प्रस्तावांना मंजुरी दिली असून, या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

टँकरच्या मागणीसाठी एक प्रस्ताव

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत टंचाईच्या झळा कमी आहेत. गतवर्षी परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावली होती. त्यामुळे पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे चित्र होते. परिणामी, मे महिन्यापर्यंत बहुतांश गावांत टंचाई जाणवली नाही. टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी केवळ रेणापूर तालुक्यातील एक प्रस्ताव दाखल आहे. सदरील प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर प्रलंबित असून, उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे.

११ कोटींचा कृती आराखडा

जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीने टंचाई निवारणासाठी कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षी ११ कोटी रुपयांचा संभाव्य कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार उपाययोजना राबविल्या जात आहेत. विशेष म्हणजे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने संबंधित गावांत पडताळणी केली जात आहे.