शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यांचे भाव वधारले; शेवगा, वांगी, भेंडी गेले शंभरीच्या घरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST

लातूर : एप्रिल आणि मे असे सलग दोन महिने लॉकडाऊनमुळे शहरासह जिल्ह्यातील बाजार बंद होता. परिणामी, भाजीपाल्यांची विक्री सकाळी ...

लातूर : एप्रिल आणि मे असे सलग दोन महिने लॉकडाऊनमुळे शहरासह जिल्ह्यातील बाजार बंद होता. परिणामी, भाजीपाल्यांची विक्री सकाळी ११ पर्यंत सुरू होती. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजी मंडईबरोबर आठवडी बाजारही सुरू झाले आहे. भाजीपाल्यांची आवक होत असली, तरी प्रतिकिलोच्या भावाने शंभरी ओलांडली आहे. जवळपास २५ टक्क्यांनी भाजीपाला महागला आहे.

लातूर शहरातील भाजी मंडई, गंजगोलाई परिसर आणि रयतु बाजारात भाजीपाल्यांसह फळांची मोठी आवक होत आहे. शेवगा, वांगी, कारले, कोबीने शंभरी ओलांडली आहे तर बहुतांश भाजीपाल्यांचा प्रतिकिलोचा भाव ८० ते १०० रुपयांच्या घरात आहे. शेवगा, वांगी, कारले हे १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

पुन्हा वरणावर जोर

अनलॉकनंतर भाजीपाल्यांची आवक वाढली असली तरी भावही वधारले आहेत. दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. दारावर येणारा भाजीपालाही स्वस्त राहिला नाही. परिणामी, गृहिणींचे बजेट आता कोलमडले आहे.

- माधुरी हिंपळनेरकर, गृहिणी

लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि भाजी मंडईत भाजीपाला दाखल झाला. आता हा भाजीपाला सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. सध्या २५ ते ३० टक्क्यांनी भाववाढ झाल्याचे दिसून येते. काही भाजीपाल्यांचे भाव दुपटीवर गेले आहेत. - मोहिनी उदगीरकर, गृहिणी

म्हणून वाढले दर

खरिपाचा हंगाम असल्याने भाजीपाल्यांची लागवड घटली आहे. परिणामी, दर गगनाला भिडले आहेत. काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांची लागवड केली आहे. तोच भाजीपाला सध्या बाजारात दाखल होत आहे. मागणी अधिक अन्‌ आवक कमी, अशी स्थिती झाल्याने भाववाढ झाली आहे. - लक्ष्मण वाढवणकर, शेतकरी

शेतकऱ्यांच्या पदरी अद्यापही निराशा

शेतात भाजीपाल्यांची लागवड करण्यात आली. त्यासाठी ४० ते ५० हजार रुपयांचा खर्चही करण्यात आला. एकरात केवळ ६० हजारांचे उत्पन्न मिळाले. बाजारपेठ मिळाली असती तर हे उत्पन्न दीड लाखांच्या घरात गेले असते.

शेतात टोमॅटो आणि मिरचीची लागवड केली होती. मात्र, ऐनवेळी लॉकडाऊनमुळे बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. त्यातून नुकसान झाले. आठवडी बाजार बंद असल्याने हा भाजीपाला विकता आला नाही. यातून केवळ ४० हजारांच्या घरात उत्पन्न मिळाले.