शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

उस्तुरी-बोरसुरी शेतरस्त्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST

उस्तुरी येथील वाक्सा शिवारातील जवळपास ६० ते ७० शेतकरी शेताकडे जाण्यासाठी उस्तुरी-बोरसुरी रस्त्याचा वापर करत होते. मात्र, रस्ता अरुंद ...

उस्तुरी येथील वाक्सा शिवारातील जवळपास ६० ते ७० शेतकरी शेताकडे जाण्यासाठी उस्तुरी-बोरसुरी रस्त्याचा वापर करत होते. मात्र, रस्ता अरुंद असल्याने, शेतातून धान्याची रास आणायचे असेल, तर शेतकऱ्यांच्या शेतातील पिके काढायची वाट पाहावी लागत हाेती. त्यातच पावसाळ्यात रस्त्यावर गुडघाभर चिखल होत असल्याने, गाई, बैल आणि म्हशींना शेतातच बांधावे लागत असे. शेतात जनावरांना चारा पाणी करण्यासाठी पावसाळ्यात पायातील वाहन हातात धरून गुडघाभर चिखलातून शेताकडे जावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त हाेते. शेताकडे जाण्यास रस्ता नसल्याने शिवारातील शेतकरी शेतात पाणी असूनही उसाची लागवड करत नव्हते. त्यामुळे उस्तुरी-बोरसुरी शेतरस्ता व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा प्रयत्न केले.

आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना रस्त्याअभावी होत असलेला त्रास पाहून स्थानिक आमदार निधीतून शेतरस्ते, पाणंदरस्ते आणि शिवरस्ते बनविण्यासाठी वेगळाच पॅटर्न राबविण्याचे काम आ.अभिमन्यू पवार यांनी हाती घेतले होते. त्यांनीही तत्काळ जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव यांना उस्तुरी येथे आणून सदरील रस्त्याचे भूमिपजन केले. गत अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची असलेली रस्त्याची मागणी पूर्ण होऊन जवळपास दीड किलोमीटर रस्त्याचे मातीकाम झाले आहे. पावसाळ्यात शिवारातील पाणी ओढ्याला आणण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नालाही घेण्यात आले आहे. एकूण १ लाख ५३ हजार खर्च करून बनविण्यात आलेल्या रस्त्याला आमदार निधीतून प्रतिकिमी ५० हजार मिळाले आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या लोकवाट्यातून करण्यात आले आहे. पूर्वी ज्या रस्त्यावरून बैलगाडी जाणे मुश्कील होते. या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून, एकाच वेळी दोन बैलगाडी जातील, असा रस्ता बनविण्यात आला आहे. शेताकडे जाण्यासाठी रस्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या धान्याच्या राशी वेळेवर होणार असून, कारखान्याचे वाहन शेतात आणता येणार असल्याने, यंदा उसाची लागवडही माेठ्या प्रमाणावर हाेणार, असल्याचे बाेलले जात आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. परिणाम, शिवारातील शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.