शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसातील पावसामुळे खरीप पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रेणापूर : तालुक्यात आतापर्यंत खरिपाच्या ८२.७३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यामुळे पिके कोमेजून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रेणापूर : तालुक्यात आतापर्यंत खरिपाच्या ८२.७३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यामुळे पिके कोमेजून जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. दरम्यान, दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात पाऊस होत असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

रेणापूर तालुक्यात पेरणीयोग्य ४८ हजार ६६० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत ४० हजार २५७ हेक्‍टरवर म्हणजे ८२.७३ टक्के पेरणी झाली आहे. दरम्यान, पाऊसही कमी-जास्त प्रमाणात झाला आहे. आतापर्यंत तालुक्यात १६३.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंदित होऊन पेरणीला सुरुवात केली होती. जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. पेरणीनंतर आठ दिवसांनी पावसाने उघडीप दिल्यामुळे उर्वरित पेरण्या थांबल्या होत्या. पेरणीनंतर उगवलेली पिके दुपार धरु लागली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, ते शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पाणी देऊन पिके जगविण्यासाठी धडपड करत होते.

दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात पाऊस होत असल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. उगवलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, अद्याप मोठ्या पावसाची गरज आहे. पावसाअभावी तालुक्यातील १३ टक्के पेरण्या थांबल्या आहेत.

३६ हजार हेक्टरवर सोयाबीन...

तालुक्यात सर्वाधिक ३६ हजार ६२५ हेक्‍टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून, तालुक्यात अद्यापही १३ टक्के पेरण्या शिल्लक आहेत. दरम्यान, मूग, उडीद, भुईमूग पेरणीचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही पिके वगळता अन्य पिकांची पेरणी करावी लागणार आहे, असे तालुका कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

तालुक्यात २६ मिमी पाऊस...

बुधवारी रात्री तालुक्यातील ५ मंडलांत सरासरी २६.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. रेणापूर मंडलात २० मिमी, पोहरेगावात २५, पानगावात १५, कारेपूरमध्ये ५३ व पळशीमध्ये २० मिमी पाऊस झाला आहे. दि. १ जूनपासून आतापर्यंत रेणापूर मंडलात १८६ मिमी, पोहरेगावात १६३ मिमी, पानगावात १२३ मिमी, कारेपूरमध्ये १५३ मिमी आणि पळशीत १९३ मिमी असा पाऊस झाला आहे. दोन दिवसात पडलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.