शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या निकालाचा पेच; महाविद्यालयांना बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST

लातूर : दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे बारावीचा निकाल तयार केला जाणार असल्याचे म्हटले जात असले ...

लातूर : दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे बारावीचा निकाल तयार केला जाणार असल्याचे म्हटले जात असले तरी अद्याप राज्य शिक्षण मंडळाकडून अथवा विभागीय शिक्षण मंडळाकडून महाविद्यालयांना कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सध्या तरी ठप्प आहे. महाविद्यालयांना मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान या विद्या शाखांमध्ये दीड लाखांच्या पुढे विद्यार्थी संख्या आहे. या विद्यार्थ्यांना गुणदान करण्यासंदर्भात कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांचे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष आहे. दहावी ४०, अकरावी ३० आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांवर ३० टक्के गुण देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. परंतु, अधिकृतरित्या या संदर्भात शिक्षण मंडळाकडून कोणत्याही सूचना नाहीत. दहावीच्या निकालाबाबत जशा सूचना शाळांना मंडळाकडून पोहोचल्या आहेत, तशा सूचना बारावीचा निकाल करण्याबाबत नसल्याने विद्यार्थ्यांसह महाविद्यालय, पालक प्रतीक्षेत आहेत.

दहावीला मेरिट असूनही अकरावीत कमी गुण असल्यास नुकसान

दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकल परीक्षांवरून मू्ल्यांकन करण्याची सूचना अमलात आली तर नुकसान होईल. दहावीला मेरिट असून, अकरावीला कमी गुण असल्यास नुकसान होईल, असा मतप्रवाह शिक्षकांचा आहे. परंतु, अद्याप यासंदर्भात सूचना नसल्याचे दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. मिलिंद माने यांनी सांगितले.

दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांवरून मूल्यमापन करावे, हे ऐकिवात आहे. या संदर्भातला कोणताही आदेश आलेला नाही. त्यामुळे प्रक्रिया बंद आहे. अकरावीच्या मुलांची मात्र ऑनलाईन चाचणी घेऊन बारावीच्या वर्गात प्रवेश देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे, असे दयानंद कला महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांनी सांगितले.

नवीन अभ्यासक्रमानुसार लातूर बोर्डांतर्गत ७७ हजार ७४९ बारावीतील विद्यार्थी संख्या आहे. यात लातूर जिल्ह्यात विज्ञान १३ हजार ८५८, कला ९ हजार ८४५, वाणिज्य ५ हजार १५५, व्होकेशनल २ हजार ४०९ असे एकूण ३१ हजार २६८ विद्यार्थी आहेत. नांदेड जिल्ह्यात विज्ञान १५ हजार ९३, कला १३ हजार ४८, वाणिज्य ३ हजार ७११, व्होकेशनल ७२२ असे एकूण ३२ हजार ५७४ विद्यार्थी आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात विज्ञान ५ हजार ९३१, कला ५ हजार २१९, वाणिज्य १ हजार ८४३, व्होकेशनल ९५९ असे एकूण १३ हजार ९५२ विद्यार्थी आहेत.

जुना अभ्यासक्रम

लातूर जिल्ह्यात विज्ञान शाखा ३२०, कला ७०९, वाणिज्य ८, व्होकेशनल १७७ असे एकूण १ हजार ३७६ विद्यार्थी.

नांदेड जिल्ह्यात विज्ञान ५४८, कला १ हजार ३७६, वाणिज्य ११५, व्होकेशनल ९५ असे एकूण २ हजार १३४ विद्यार्थी.

उस्मानाबाद जिल्ह्यात विज्ञान २०८, कला ५१३, वाणिज्य १०१, व्होकेशनल ११९ असे एकूण ९४१ विद्यार्थी.