शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

चाकूरच्या बसस्थानकातील स्वच्छतागृह १५ वर्षांपासून कुलूपबंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST

चाकूर : येथील बसस्थानकात विविध समस्या निर्माण झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. गेल्या १५ वर्षांपासून बसस्थानकातील स्वच्छतागृह बंद आहे. ...

चाकूर : येथील बसस्थानकात विविध समस्या निर्माण झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. गेल्या १५ वर्षांपासून बसस्थानकातील स्वच्छतागृह बंद आहे. या गंभीर समस्येकडे एस.टी. महामंडळाचे दुर्लक्ष आहे. नगर पंचायतीने जोरदार स्वच्छता मोहिमेची सुरुवात करून बसस्थानकाच्या आवारात स्वच्छतागृह उभारली होती. प्रारंभी पथकाने पाहणी केली. मात्र, त्यानंतर स्वच्छतेच्या मोहिमेकडे पाठ फिरविली गेल्याचे चित्र आहे. स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

संपूर्ण देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असताना या स्वच्छता मोहिमेत चाकूर नगर पंचायत सहभागी झाली होती. मोहिमेंतर्गत नगर पंचायतीने मोठा गाजावाजा करून जनजागृती केली होती. शहरातील बसस्थानकात ४, यशवंतराव प्राथमिक शाळेजवळ ४, लक्ष्मीनगरात ४, सिद्धार्थनगरात ७, चाकूर रेल्वे स्थानकाजवळ २ अशी सार्वजनिक शौचालयांची निर्मिती करण्यात आली होती. बसस्थानकातील शौचालयाजवळ पाणी, वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला होता. दरम्यान शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी पथके आली असता नगर पंचायतचे कर्मचारी उघड्यावर कोणीही शौचास जाऊ नये म्हणून खडा पहारा देत होते. मात्र, पथक परतले, की पुन्हा पूर्वीची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, दुसऱ्यांदा विभागीय पातळीवरील पथक चाकुरात दाखल होत असताना नगर पंचायतीने लगबगीने स्वच्छता मोहीम राबविली. हेही पथक परतल्यानंतर या शौचालयाकडे कोणी फिरकूनही पाहिले नाही. शौचालयांची व परिसराची साफसफाई केली जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणच्या शौचालयांच्या दरवाजांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकात घाणीच्या साम्राज्याने जनावरांचा खुलेआम वावर वाढला आहे. तर बसस्थानकाच्या शेजारी असलेले काही दुकानदार त्यांचा कचरा बसस्थानकाच्या आवारात आणून टाकतात. नगर पंचायतीने स्वच्छता मोहिमेंतर्गत उभारलेली सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्याचा परिणाम प्रवास करणाऱ्या पुरुष, महिला प्रवाशांना सहन करावा लागत आहे. बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना चक्क बसस्थानकातील आवारात उघड्यावरच प्रातर्विधी उरकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. या भागातील काही लोक प्रातर्विधी, लघुशंका करण्यासाठी बसस्थानकाच्या खुल्या आवाराचा आधार घेतात. त्यामुळे स्वच्छतागृहाचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात...

ग्रामीण भागातील नागरिक एसटी बसनेच प्रवास करतात. लांबचा प्रवास करून आल्यास या ठिकणी स्वच्छतागृहाची सोय नाही. परिणामी, नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- नागनाथ पाटील, चाकूर

बीओटी तत्त्वावर बांधकामाचा प्रयत्न

चाकूर येथील बसस्थानकातील स्वच्छतागृह खराब झाले आहे. सध्या ते बंद आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाची कुचंबणा होत आहे. याची आम्हाला जाणीव आहे. तेथे नगर पंचायतीने स्वच्छतागृह बांधून द्यावे. यासाठी पाठपुरावा करत आहोत. अन्यथा बीओटी तत्त्वावर बांधण्याचा प्रयत्नही सुरू आहे.

-सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, लातूर

जागा दिल्यास प्रश्न मार्गी

चाकूर येथील बसस्थानकात एसटी महामंडळाने आम्हाला जागा दिली, तर नगर पंचायत स्वच्छतागृह बांधून ते चालवू शकते; परंतु बांधकाम करून लगेच हस्तांतर करू शकत नाही.

- अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, चाकूर