शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

औराद शहाजानीच्या पाणीपुरवठा याेजनेला तांत्रिक मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास सन २०२४ पर्यंत नळ कनेक्शन देऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ही ...

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास सन २०२४ पर्यंत नळ कनेक्शन देऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. या मिशनअंतर्गत औराद शहाजानीच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाच्या तांत्रिक समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. राज्याच्या जलजीवन मिशन अभियानचे संचालक आर. विमला यांच्या सूचनेनुसार ही माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी जिल्ह्याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची टीम गुरूवारी औराद येथे आली होती. यामध्ये उपकार्यकारी अभियंता नाना जोशी, उपविभागीय अभियंता बी.एम. शिंदे व शाखा अभियंता के.के. खरोसेकर यांचा समावेश होता.

औराद शहाजानीची पाणीपुरवठा योजना १७ कोटी ५७ लाखांची असून सन २०३८ पर्यंतची गावची लोकसंख्या गृहित धरून आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लीटर शुध्द पाणी मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला मासिक शंभर रूपये द्यावे लागणार आहेत. यासाठी १६ लाख ७८ हजार लिटर क्षमतेची एक पाण्याची टाकी उभारली जाणार आहे. पाणी फिल्टरची यंत्रणाही असणार आहे. गावात एकूण ३ हजार ६०० नळ कनेक्शन गृहित धरून ही योजना तयार करण्यात आली आहे असे सांगून योजनेच्या अंदाजपत्रकाची माहिती शाखा अभियंता के.के. खरोसेकर यांनी दिली.

ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा...

ही पाणीपुरवठा योजना २०२३ पर्यंत कार्यान्वित होईल. त्यासाठी आवश्यक ती पूर्तता व पाठपुरावा औराद शहाजानी ग्रामपंचायतीकडून केला जाईल, असे उपसरपंच महेश भंडारे यांनी सांगितले. दरम्यान, या पथकाने पाणीपुरवठ्याच्या जलस्रोतांची पाहणीही केली. याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार उपसरपंच महेश भंडारे, लक्ष्मण कारभारी व बालाजी भंडारे यांनी केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवि गायकवाड, राजू रेड्डी, कन्हैया पाटील, महेंद्र कांबळे, ग्रामसेवक धनाजी धनासुरे, प्रा. प्रदीप पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.