शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना लागली शाळेची ओढ; पालक मात्र संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : जिल्ह्यात ५ वी ते १२ वीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले आहेत. मात्र १ ली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : जिल्ह्यात ५ वी ते १२ वीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले आहेत. मात्र १ ली ते ४ थीच्या वर्गांना शिक्षण विभागाने हिरवा कंदिल दिलेला नाही. त्यामुळे प्राथमिक शाळेतील किलबिलाट सध्या बंद आहे. दरम्यान, प्राथमिकची मुले शाळेत जाण्यासाठी आतुर झाली असून, पालक मात्र आपल्या पाल्यास शाळेत पाठवावे की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत आहेत.

जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या १ हजार ७ शाळा आहेत. यामध्ये पहिली वर्गात ४६ हजार ७७८, दुसरी ४६ हजार ७३३, तिसरी ४६ हजार ६२१, तर चौथीच्या वर्गात ४७ हजार ६९९ असे एकूण १ लाख ८७ हजार ८३१ विद्यार्थी आहेत. कोरोनाच्या संकटामुळे पहिली ते चौथीचे वर्ग अद्यापही बंद आहेत. ऑनलाईन शिकवणी होत असली तरी गेल्या दहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागली आहे. अद्याप १ ली ते ४ थीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय झाला नसला तरी पालक मात्र संभ्रमात आहेत.

गेल्या दहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळेत जाण्याची आतुरता लागली आहे. मात्र कोरोनामुळे घरच्या घरीच अभ्यास करावा लागत आहे.

- आक्सा पठाण, विद्यार्थिनी

ऑनलाईनद्वारे शिकवणी होत आहे. अंगणवाडीनंतर पहिल्या वर्गात प्रवेश झाला तरी नव्या वर्गातील मित्रांची भेट झालेली नाही. त्यामुळे त्यांना भेटण्याची इच्छा आहे.

- मानसी महामुनी, विद्यार्थिनी

लाॅकडाऊनपासून शाळा बंद आहेत. घरीच ऑनलाईन अभ्यास करावा लागतो. मित्रांचीही अनेक दिवसांची भेट नाही. त्यामुळे शाळेत जाण्याची ओढ असून, दिवसभर घरीच राहून कंटाळा आला आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पालकांच्या संमतीने नियमित शाळेत जाणार आहे. - रुद्र आलमले, विद्यार्थी

शाळा बंद असल्याने मैदानी खेळांचा आनंद घेता आला नाही. दिवसभर घरी राहूनच ऑनलाईन अभ्यास करावा लागला. मित्रांशी फोनद्वारे संवाद साधावा लागत आहे. अभ्यासातील अडचणीही सोडविण्यासाठी गैरसोय होत आहे. शाळा सुरू झाल्यास नियमित मैदानी खेळ खेळता येतील.

- ध्रुव बिराजदार

विद्यार्थी