शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

गोगलगाय प्रादुर्भावाच्या नुकसान भरपाईसाठी रेणापूर कडकडीत बंद

By हरी मोकाशे | Published: September 24, 2022 6:59 PM

पिंपळफाटा येथे शेतकऱ्यांचा अर्धा तास ठिय्या

रेणापूर (जि. लातूर) : गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. नुकसानीची भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी शेतकऱ्यांच्यावतीने रेणापुरात बंदचे आवाहन करण्यात आले. त्यास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. दरम्यान, शेतकऱ्यांनी पिंपळफाटा येथे अर्धा तास ठिय्या आंदोलन केले.

रेणापूर तालुक्यात खरिपातील सोयाबीचे पीक चांगले उगवले होते. त्यामुळे चांगले उत्पादन होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे उगवलेल्या पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली. परंतु, सतत गोगलगायींचा प्रादुर्भाव होत राहिला. त्यातच अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण पिकास फटका बसला.

दरम्यान, प्रशासनाने गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील ३ हजार ३१५ शेतकऱ्यांच्या शेतातील २५०० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचे दाखविले आहे. ही शेतकरी संख्या आणि क्षेत्र संपूर्णपणे चुकीचे आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पंचनामे केले नाहीत. त्यामुळे आम्ही वारंवार ताेंडी तक्रारी, लेखी निवेदने दिली. परंतु, वास्तविक पंचनामे करण्यात आले नाहीत.शासनाने तालुक्यातील केवळ ३ हजार ३१५ शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. ती आम्हा शेतकऱ्यांस मान्य नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान द्यायचे असल्यास सरकारने सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

गोगलगाय अनुदानात तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. तो दूर करावा. येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करीत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

या आंदोलनात संजय इगे, बालाजी कदम, बाळासाहेब कातळे, सचिन मोटेगावाकर, राजन हाके, अजय औसेकर, रफिक सय्यद, शरद दरेकर, प्रकाश जाधव, रमाकांत वाघमारे, दशरथ मेकले, बळीराम मुंगे, समाधान गाडे, श्रीपाल बस्तापुरे, विश्वनाथ गायकवाड, ॲड. देविदास कातळे, जी.एम. उटगे, राम पाटील, अतुल कातळे, सोनू उरगुंडे ,धनराज भांबरे, सतीश माने, दिलीप अकनगिरे, सचिन इगे, गणेश कलशेट्टी आदी शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी