शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मंजुरीनंतरही खरोसा जलयोजनेच्या पुनरुज्जीवनाचे काम रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST

खरोसा : औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील ९ गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने २००६ मध्ये ११ कोटी ...

खरोसा : औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील ९ गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने २००६ मध्ये ११ कोटी खर्चून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत ६ खेडी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली; परंतु विविध कारणांनी ती बंद पडली. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी ४ कोटी ३५ लाखांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली, तसेच एमजीपीने ६० लाखांची थकबाकी भरली; मात्र ९ गावांचा पाणी प्रश्न कायम राहिला आहे.

औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने ऑगस्ट २००६ मध्ये साडेअकरा कोटी खर्च करून ६ खेडी पाणीयोजना कार्यान्वित केली. ही योजना निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पावरून राबविली जाते. या योजनेंतर्गत खरोसा, शेडोळ, किनीनवरे, तांबरवाडी, चलबुर्गा, जावळी या गावांसह आनंदवाडी, जाऊ आणि मोगरगा या गावांचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गतची ही जलयोजना सुरुवातीस सहा गावांसाठी होती. दरम्यान, आणखीन तीन गावांचा समावेश करण्यात आला. काही काळ ही योजना सुरळीत होती; परंतु सन २०१० पासून पाणी तसेच थकीत वीज बिलामुळे योजनेस घरघर लागली.

दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत खरोसा सहा खेडी पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शासनाकडे दाखल केला होता. या प्रस्तावावर राज्याच्या पाणी पुरवठा विभागाने डिसेंबर २०१८ मध्ये निर्णय घेऊन त्यासाठी ४ कोटी ३५ लाखांच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली होती. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने थकीत वीज बिलाची निम्मी रक्कम म्हणजे ६० लाख ९ फेब्रुवारी २०२१ रोजी भरली. निम्मी थकबाकी भरूनही सहा महिन्यांचा काळ उलटला तरीही नऊ गावांचा पाणी प्रश्न सुटला नाही.

प्रकल्पात जलसाठा असून, नागरिक तहानलेले...

ही जलयोजना मसलगा मध्यम प्रकल्पावरून राबवली जाते. प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असतानाही उन्हाळ्यात योजनेवर अवलंबून असलेल्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागली आहे. आता पावसाळ्यातही तशीच स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

४.२५ दलघमी उपयुक्त पाणी...

या मध्यम प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा ५.३३ दलघमी असून, उपयुक्त पाणीसाठा ४.२५ दलघमी आहे. पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना समस्येस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास अद्यापही कायम आहे.

वीज जोडणीअभावी कामे रेंगाळली...

मसलगा प्रकल्पावरील, खरोसा डोंगरावरील जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ आणि जलवाहिनीची किरकोळ कामे झाली आहेत. वीज जोडणीअभावी काही कामे रेंगाळली आहेत. लवकरच ती पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.