शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST

कोरानाचा संसर्ग रोखण्यासाठी येथील कोरोना नियंत्रण समितीचे प्रमुख तहसीलदार अतुल जटाळे यांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी नगरपंचायत आणि ...

कोरानाचा संसर्ग रोखण्यासाठी येथील कोरोना नियंत्रण समितीचे प्रमुख तहसीलदार अतुल जटाळे यांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी नगरपंचायत आणि पोलिसांचे संयुक्त पथक स्थापन केले आहे. विकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवार व रविवारी कडक कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसांत २४१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये विनाकारण फिरणे, मास्कचा वापर न करणे, फिजिकल डिस्टन्स न राखणे याबाबत कारवाई करण्यात आली.

राज्य मार्गावरील महात्मा बसवेश्वर चौक, नगरपंचायत कार्यालय, पेट्रोल पंप आदी ठिकाणी पथकाने दोन्ही दिवशी दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे या दोन दिवसांत बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता.

विनामास्क आढळले ६० जण...

विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांमध्ये दुचाकी, चारचाकी घेऊन फिरणाऱ्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्या ६० जणांवर, तर १८१ वाहनधारकांवर मोटारवाहन कायद्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. दोन दिवसांत २४१ जणांकडून ९० हजारपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला.

शेतीविषयक कामासाठी कारवाई नको...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शेतीविषयक कामांसाठी सवलत दिली आहे. त्यामुळे शेतीविषयक कामासाठी बाजारपेठेत जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक व्यंकटराव पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे.