शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात भाजीपाल्यांचा भाव घसरला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST

सध्या किराणा मालाचे दर मात्र स्थिर ! लातूर : शहरासह जिल्ह्यातील आठवडी बाजारात दिवाळीनंतर टप्प्या-टप्प्याने भाजीपाल्यांचे दर घसरले. ...

सध्या किराणा मालाचे दर मात्र स्थिर !

लातूर : शहरासह जिल्ह्यातील आठवडी बाजारात दिवाळीनंतर टप्प्या-टप्प्याने भाजीपाल्यांचे दर घसरले. सध्या भाजीपाला कवडीमोल किंमतीत विक्री केला जात आहे. तर किराणा मालाचे दर दोन आठवड्यांपासून स्थिर आहेत. ३० रुपयांना मिळणारी मेथीची पेंढी आता ३ रुपयांवर आली आहे. १० रुपयांत तीन ते चार पेंढ्या दिल्या जात आहेत.

दिवाळी सणाच्या तोंडावर खाद्य तेलासह हरभरा डाळीचे भाव वधारले होते. आता दिवाळीनंतर किराणा मालाचे दर स्थिर आहेत. सध्या साखर ३५ रुपये किलो दराने विकली जात आहे. खाद्य तेल १२० रुपये, पामतेल १०५ रुपये, खोबरं १६० रुपये, हरभरा डाळ प्रति किलो ७५ ते ८० रुपये, तूर डाळ १०५, मसूर डाळ ९० रुपये, मूगदाळ आणि उडीद डाळीचा प्रति किलो ११५ रुपयांचा भाव आहे. दिवाळीच्या दरम्यान लातूरच्या भाजी मंडईत भाजीपाल्यांचे प्रति किलोचे भाव शंभरीच्या घरात होते. आता ते २० रुपयांच्या घरात आले आहेत. तब्बल ७० ते ८० टक्के भाव घसरले आहेत. १२० रुपये किलोने मिळणारी फुलकोबी सध्या १० ते १५ रुपये किलो मिळत आहे. पत्ताकोबी २५, वांगी २५, बटाटे ४०, भेंडी ३०, गवार ५०, दोडका ३०, टोमॅटो ३०, गाजर ४०, भोपळा २०, पालक १०, कांदापात ८, हिरवी मिरची ३० रुपये, कोथिंबीर १०, चुका ७०, वरणा ४० रुपये प्रति किलोने विक्री केला जात आहे.

ऐन दिवाळीत कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. प्रति किलो ८० रुपयांच्या घरात भाव गेला होता. आता कांद्याचे भावही टप्प्या-टप्प्याने घसरू लागले आहेत. प्रति किलो ३५ ते ५० रुपये दराने कांदा मिळत आहे. सर्वाधिक भाव चुक्याचा आहे. प्रति किलो ७० रुपयाने नागरिकांना चुका विकत घ्यावा लागत आहे.

लातूर येथील फळबाजारात चिकू, मोसंबी, केळी आणि सफरचंदाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सफरचंद प्रति किलो सध्या ८० ते १०० रुपये दराने मिळत आहे. चिकू ५० रुपये किलो दराने तर मोसंबी ५० ते ६० रुपये आणि केळी ४० रुपये डझनाने मिळत आहे.

दिवाळी सणाच्या तोंडावर खाद्य तेलाबरोबर डाळींचे भाव वाढले होते. आता ते भाव स्थिर झाले आहेत. साखरेचा भाव मात्र दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतरही ३५ रुपयेच आहे. त्यापाठोपाठ खाद्य तेल प्रति किलो १२० रुपये आहे. किराणाचे दर स्थिर आहेत.

-निलेश हलगरकर,

हिवाळ्याच्या हंगामात फळांना मोठी मागणी असते. रानमेवा असलेल्या सीताफळासह सफरचंद, चिकू, संत्रा, केळी आणि इतर फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या चिकू आणि सफरचंदाची मागणी मोठी आहे. त्यांचे भावही शंभराच्या आत आहेत.

- बाबा शेख,

लातूरसह जिल्हाभरातील बाजारात भाजीपाला कवडीमोल झाला आहे. प्रति किलो १० ते २० रुपयांच्या घरात विकला जात आहे. यातून भाजी विक्रेत्यांचा रोजगारही निघत नसल्याचे चित्र आहे. मेथी, कोथिंबीर आणि इतर भाजीपाल्याचे दर घसरले आहेत.

- भीमा शिंदे,