शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

खडीने डागडुजी केलेले खड्डे पुन्हा उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST

अहमदपूर : सततच्या आंदोलनामुळे महामार्ग प्राधिकरणाने येथील महामार्गावरील खड्डे बुजविले. मात्र, अवजड वाहन धावल्याने पुन्हा खडी उघडी पडली आहे. ...

अहमदपूर : सततच्या आंदोलनामुळे महामार्ग प्राधिकरणाने येथील महामार्गावरील खड्डे बुजविले. मात्र, अवजड वाहन धावल्याने पुन्हा खडी उघडी पडली आहे. त्यामुळे महामार्गास पूर्वीची अवस्था आली आहे. परिणामी, वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, उपजिल्हाधिकाऱ्यांनी या स्थितीची पाहणी केली आहे.

लातूर-नांदेड हा महामार्ग अहमदपूर शहरातून जातो. या महामार्गावरील खड्डे पाहता हा महामार्ग आहे की, खेडेगावचा रस्ता अशी स्थिती आहे. दुरुस्तीसाठी दोन महिन्यांपासून निवेदने देऊन आंदोलने करूनही महामार्ग प्राधिकरणने लक्ष दिले नाही. मात्र, आता संबंधित गुत्तेदाराला आदेश देण्यात आल्याने संबंधित गुत्तेदाराने केवळ मोठ्या खड्ड्यांमध्ये खडी टाकून डागडुजी केली. परंतु, अवजड वाहनांच्या रहदारीमुळे खड्ड्यांमधील खडी उघडी पडली आहे. परिणामी, रस्त्यास पूर्वीची स्थिती आली आहे. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

१५ दिवसांपूर्वी याबाबत आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुनील पाटील यांना प्रत्यक्ष जागेवर आणून खड्डे भरण्याच्या दर्जाविषयी विचारणा करून तक्रार केली होती. मात्र, महामार्ग प्राधिकरणच्या कामाच्या दर्जात फारसा फरक पडला नाही. केवळ २० कि.मी.वरील खड्डे बुजविण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. उर्वरित ठिकाणचे लवकर खड्डे बुजविले जातात. त्यामुळे संभ्रमावस्था आहे. दरम्यान, टाकलेल्या खडीवर काही दुचाकीस्वार घसरून पडल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

गुत्तेदाराने अहमदपूर ते शिरूर ताजबंद मार्गावरील काही खड्डे बुजविले असले तरी अहमदपूर सांगवी मार्गावरील खड्डे अजून आहेत. याबाबतच्या तक्रारी प्राप्त होताच उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच दर्जाविषयी गुत्तेदारास सूचना केल्या. तसेच शिरूर ते चापोली या मार्गावर अजूनपर्यंत काम केले नाही. ७७ कि.मी.पैकी ३५ कि.मी.चे काम अजूनही शिल्लक आहे.

खडी टाकल्यानंतर डांबरीकरण...

महामार्गावर एक ते दीड फुटाचे खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी अगोदर खडी टाकण्यात येत आहे. दोन दिवसांनंतरचा डांबरीकरण करून रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे गुत्तेदाराकडून सांगण्यात आले.

७७ पैकी ३५ कि.मी.चे काम...

गुत्तेदाराने ७७ पैकी केवळ ३५ कि.मी.चे काम पूर्ण केले आहे. माळेगाव ते चापोली दरम्यानचे खड्डे अद्यापही आहेत. रस्त्याच्या दर्जाविषयी पाहणी करून महामार्ग प्राधिकरणला सूचना मी स्वतः सूचना केल्या आहेत. दर्जा सुधारणाविषयी पत्रव्यवहार केला असल्याचे उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले.