शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका अन्‌ किचनमध्ये महागाईचा तडका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST

पेट्रोल-डिझेलचे प्रति लिटरचे भाव सातत्याने बदलतात. २०१८ मध्ये पेट्रोल आणि डिझेल ७० ते ८० रुपयांच्या घरात होते. ते आता ...

पेट्रोल-डिझेलचे प्रति लिटरचे भाव सातत्याने बदलतात. २०१८ मध्ये पेट्रोल आणि डिझेल ७० ते ८० रुपयांच्या घरात होते. ते आता शंभरीपार केले आहे. यातून वाहतुकीचा खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्यांचे दर ५० टक्क्याने वाढले आहेत. ६० रुपये किलो दराने मिळणारा भाजीपाला आता १०० ते १२० रुपयांच्या घरात गेला आहे. खाद्यतेल प्रति किलो ९० ते ९५ रुपयांना मिळत होते. आता ते १५० रुपयांच्या घरात आहे. इंधन दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीचे दरही वाढले आहेत. शेती आणि घर खर्चावर होणाऱ्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातून सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. इंधन दरवाढीचा फटका प्रवासी वाहतुकीलाही बसला आहे. खासगी वाहतूकदारांनी तिकिटांचे दरही वाढविले आहेत.

ट्रॅक्टरची शेतीही महागली

एका एकरावरील नांगरटीला हजार ते बाराशे रुपयांचे डिझेल लागत आहे. दोन वर्षात हजार रुपये एकर नांगरटी दीड हजारांवर पोहोचली आहे. प्रत्येकी सहाशे रुपये एकरी प्रमाणे होणारी पेरणी, मोगडणी अन्‌ पाळी हजारांवर गेली आहे. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

किराणा मालाची वाहतूक करण्यासाठी आता दीड पटीने भाडे मोजावे लागत आहे. यातून भाववाढ केल्याशिवाय पर्याय नाही. ५० किलोमीटरच्या अंतरात एका तेलाच्या डब्याला १० ऐवजी १५, तर एका क्विंटल साखरेला २० ऐवजी ३० रुपये भाडे मोजावे लागत आहेत. - सतीश जाधव

सध्या दिवसेंदिवस होणाऱ्या इंधन दरवाढीचा फटका प्रत्येक व्यवसायाला बसला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्यानंतर आपोआप वस्तूंचे भाव वाढतात. याचा भार ग्राहकांना सहन करावा लागतो. - बालाजी कांबळे

पत्ताकोबी ६० रुपये किलो

लातूरच्या भाजी मंडईत दाखल होणाऱ्या भाजीपाल्यांच्या दराने आता शंभरी ओलांडली आहे. प्रति किलो सरासरी ८० ते १२० रुपये किलो दराने भाजीपाला मिळत आहे. पत्ताकोबी ६० रुपये, फुलकोबी ६० रुपये, टोमॅटो २० ते ३० रुपये, शेवगा १००, चवळी १०० रुपये दराने मिळत आहे.

डाळ स्वस्त तर तेल महाग

किराणा मालामध्ये डाळींचे भाव आवाक्यात आहेत; मात्र खाद्यतेल आवाक्याबाहेर गेले आहे. प्रतिकिलो ९५ रुपये असणारे तेल १४५ रुपयांवर गेले आहे.

डाळीमध्ये हरभरा, मसूर डाळ, तूर डाळ, मूग, उडीद प्रति किलो ६० ते ८० रुपयांच्या घरात आहे. डाळींचे दर आवाक्यात असले तरी तेल महागले आहे.

खाद्य तेलाचे भाव दीडपटीने वाढल्याने सर्वसामान्यांच्या घरात महागाईची फोडणी द्यावी लागत आहे. यातून आर्थिक नियोजन मात्र कोलमडले आहे.

घर चालविणे झाले कठीण

पेट्रोल आणि डिझेलचे भाव शंभरावर गेले आहेत. यातून जीवनावश्यक वस्तू व भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. दर महिन्याला दोन हजार रुपयांचा किराणा लागत होता. तो आता तीन हजार रुपयांवर गेला आहे. शिवाय, सातशे ते आठशे रुपये भाजीपाल्यासाठी लागत होते. ते आता दीड हजार रुपयांवर गेले आहे. - माधुरी हिंपळनेरकर

इंधनाच्या दरवाढीने महागाईचा फटका सामान्य कुटुंबांना सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या परिस्थितीत अनेक कुटुंबांचा रोजगार गेला आहे. अशा स्थितीत घरप्रपंच चालविणे अवघड झाले आहे. महागाईने अनेकांना अडचणीत आणले आहे. काटकसर करून घरप्रपंच चालवावा लागत आहे. याचा खर्च दीडपटीने वाढला आहे. - मोहिनी उदगीरकर