शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

आता वीकेंड घरातच; हॉटेलिंग राहणार बंद; कामगार अडचणीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना अनलॉक करण्यात आले होते. व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच राज्य शासनाने नवे निर्बंध ...

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना अनलॉक करण्यात आले होते. व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच राज्य शासनाने नवे निर्बंध पुन्हा लागू केले आहेत. त्यानुसार गर्दी रोखण्यासाठी रविवारी सायंकाळी ४ वाजल्यानंतर सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ यावेळेत हॉटेल सुरू राहणार असून, शनिवार आणि रविवार या वीकेंडच्या कालावधीत हॉटेलमधून केवळ पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. लातूर शहरात जवळपास दीडशेहून अधिक हॉटेल, रेस्टॉरंट आहेत. त्यावर अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अडीच हजार आहे. मात्र, नवीन नियमामुळे हॉटेल व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

शहरातील एकूण हॉटेल्स १५०

हॉटेल्सवर अवलंबून असलेले कर्मचारी २,५००

हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार

दीड वर्षापासून कोरोनाच्या साथीमुळे हॉटेल व्यवसाय कोलमडला आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र, नव्या निर्बंधांमुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. शासनाने यावर तोडगा काढण्याची गरज आहे. - प्रवीण कस्तुरे, हॉटेल व्यावसायिक

अनलॉक झाल्यानंतर हॉटेल व्यवसाय परिस्थितीत बदल होत होते. मात्र, अचानक दुपारी ४ वाजेपर्यंतच हॉटेल सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. शनिवार, रविवार केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. या नियमांमुळे हॉटेल व्यवसायाचे मोठे नुकसान होणार आहे. - प्रसाद उदगीरकर, हॉटेल व्यावसायिक.

सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता राहणार

हॉटेल व्यवसाय हा अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा म्हणून ओळखला जातो. यावर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे. अनेकजण कुटुंबासमवेत जेवणासाठी हॉटेलला पसंती देतात.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कधी चालू तर कधी बंद अशा संकटामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे नियोजन कोलमडले आहे.

सकाळी ७ ते ४ यावेळेत हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोजकीच असते. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल

गेल्या दीड वर्षापासून हॉटेल कधी चालू तर कधी बंद आहेत. त्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात येते. त्यामुळे हाताला काम मिळत नाही. आता परिस्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र, आता त्यात नवीन नियमामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - शरद मगर

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला की, लॉकडाऊन जाहीर केले जाते. मात्र, सर्वसामान्यांना या निर्णयामुळे त्रास सहन करावा लागतो. हॉटेलसाठी निर्बंध लागू करण्यात आल्याने कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न बंद होईल. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न आहे. - नेताजी मोतीबोणे