शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले; आठवडी बाजार, गर्दीत चोरटे सक्रिय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST

५० टक्के मोबाईलचा तपास लागतच नाही लातूर जिल्ह्यात प्रवासादरम्यान, भाजी मंडई, प्रमुख बाजारपेठ आणि आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे ...

५० टक्के मोबाईलचा तपास लागतच नाही

लातूर जिल्ह्यात प्रवासादरम्यान, भाजी मंडई, प्रमुख बाजारपेठ आणि आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरट्यांकडून पळविले जातात. यांतील जवळपास मोबाईलचा शोध लागत नसल्याचा तक्रारदारांना अनुभव आहे. तक्रार केल्यानंतर महिना, दोन महिन्यांनंतर नागरिकही पाठपुरावा करीत नाहीत. केला तरी ते हतबल ठरतात.

मोबाईल चोरणाऱ्या स्वतंत्र टोळ्या

शहरातील गर्दीच्या ठिकाणी, प्रमुख बाजारपेठ आणि ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडी बाजारात मोबाईल चोरणाऱ्या स्वतंत्र टोळ्या सक्रिय आहेत. यामध्ये काही अल्पवयीन गुन्हेगारांचाही समावेश आहे. ज्या भागात आठवडी बाजार आहे, त्या भागातील ठाण्यांत मोबाईल चोरीच्या तक्रारी दाखल होतात. गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातील मोबाईल लंपास केला जातो. काही कळण्याच्या आतच हे चोरटे पसार होतात.

मोबाईल चोरीस जाताच तातडीने हे करा

एखाद्या नागरिकाचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर त्याने तातडीने संबंधित पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करावी. प्रारंभी सिमकार्ड बंद करून टाकावे. मोबाईलमधील सर्व प्रकारचे पासवर्ड बदलून टाकावे. ऑनलाईन बँकिंग असल्यास तातडीने बँकेला माहिती देऊन व्यवहार बंद करावा. यातून चोरीला गेलेल्या मोबाईलचा गैरफायदा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

सायबर सेलकडून चोरीचा तपास

मोबाईल चोरीच्या तक्रारी ठाणे स्तरावर दाखल होतात. तेथून सायबर सेलकडे माहिती पुरविली जाते. मोबाईल चोरी प्रकरणाचा तपास सायबर सेलकडूनही केला जातो. चोरीतील मोबाईल कोणी वापरत असेल तर लोकेशन तपासले जाते. त्या अनुषंगाने आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी सायबरची मदत होते.

- निखिल पिंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, लातूर.

हेल्पलाईनची मदत घ्या

मोबाईल फोन हरविल्यानंतर किंवा चोरीला गेला तर तातडीने हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर तुमची तक्रार नोंदविण्यात येते. त्याचबरोबर मोबाईलचे नेटवर्क बंद होते. आयएमईआय क्रमांकावरून ऑपरेटर्स नेटवर्क ब्लॉक करू शकतील. ज्यातून मोबाईलचा गैरवापर होणार नाही.

लातूर जिल्ह्यात यापूर्वी आयएमईआय क्रमांक बदलण्याचे प्रकारही घडले आहेत. या प्रकरणी यापूर्वी लातुरातून पोलिसांनी काहीजणांना अटक केली होती. चोरीतील मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी असे प्रकार केले जातात. त्यातून तपासामध्ये अडचणी येतात.