शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुली ‘लाॅक’;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

राजकुमार जाेंधळे । लातूर : काेराेना काळात सर्वत्र नाकाबंदी, कडक निर्बंधामुळे अल्पवयीन मुली घरातच ‘लाॅक’ झाल्या असून, २०१८ मधील ...

राजकुमार जाेंधळे ।

लातूर : काेराेना काळात सर्वत्र नाकाबंदी, कडक निर्बंधामुळे अल्पवयीन मुली घरातच ‘लाॅक’ झाल्या असून, २०१८ मधील आकडेवारीच्या तुलनेत २०२० मध्ये बेपत्ता हाेण्याचे प्रमाण २० टक्क्यांनी घटले आहे. परिणामी, काेराेनाने अनेकांना घरातच जायबंदी केले आहे. २०१८ मध्ये १०१ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची नाेंद जिल्ह्यातील त्या-त्या पाेलीस ठाण्यांच्या दप्तरी आहे. आता २०२० मध्ये हीच आकडेवारी ९३ च्या घरात आली आहे.

लातूर जिल्ह्यात काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पाेलीस दलाच्या वतीने मार्च २०२० पासून कडक निर्बंध जाहीर करण्यात आले. या निर्बंधांना अधून-मधून शिथिलता देण्यात आली. परिणामी, याच काळात अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या. २०१८ मध्ये एकूण १०१ मुली बेपत्ता झाल्या असून, त्यातील ९९ मुलींचा शाेध लावण्यात यश आले आहे. तर २ मुलींचा शाेध लागला नाही. २०१९ मध्ये ९६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील ८२ मुलींचा शाेध लागला असून, १४ मुली अद्यापही बेपत्ता आहेत. २०२० मध्ये एकूण ९३ मुली बेपत्ता असून, ८२ मुली सापडल्या आहेत. तर ११ मुली अद्यापही बेपत्ता आहेत. जानेवारी ते मे २०२१ अखेर ५८ मुली बेपत्ता असल्याचे समाेर आले आहे. यातील ४२ मुलींचा शाेध लागला असून, १६ मुली अजूनही बेपत्ता आहेत.

काेराेना काळात नियमांचे पालन व्हावे, यासाठी पाेलीस दल २४ तास कर्तव्यावर आहे. या काळात बेपत्ता झालेल्या बहुतांश मुलींचा शाेध लावण्यात आम्हाला यश आले आहे. हे प्रमाण जवळपास ८० ते ९० टक्क्यांच्या घरात आहे. यातील काही घटनात प्रेमप्रकरण हे कारण समाेर आले आहे. याबाबत त्या-त्या पाेलीस ठाण्यात स्वतंत्र अपहरणाचे गुन्हे दाखल असून, शाेधकार्य मात्र ८० टक्क्यांवर यशस्वी झाले आहे.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर

८५ टक्के मुलींचा शाेध लावण्यात आले यश...

२०१८ मध्ये एकूण १०१ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या. यातील ९९ मुलींचा शाेध लागला असून, याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर आहे. केवळ २ टक्के मुलींचा शाेध अद्यापही सुरु आहे. २०१९ पासून अपहरण झालेल्या ९६ मुलींपैकी ८२ मुलींचा शाेध लागला आहे. हे प्रमाण ८० टक्क्यांवर आहे़ २०२० मध्ये तब्ब्ल ९३ मुली बेपत्ता,अपहरण झाले आहे. यातील ८२ मुलींचा शाेध लागला आहे. तर ११ मुलींचा पत्ताच लागला नाही. ही टक्केवारी ८५ टक्क्यांच्या घरात आहे. जाेनवारी ते मे २०२१ अखेर ५८ मुलीं बेपत्ता झाल्या असून, ४२ मुलींचा शाेध लावण्यात यश आले आहे. उर्वरित १६ मुलींचा शाेध अद्यापही सुरुच आहे़ हे प्रमाण ८० टक्क्यांवर आहे. २०१८ पासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलींचा शाेध सुरुच आहे.

शाेधकार्यासाठी पाेलीस पथकांची नियुक्ती...

अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली तर, तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला जाताे. तपासाची चक्रे गतिमान केली जातात. विशेष म्हणजे, एखादा धागा हाती लागला की शाेध घेणे अधिक सुलभ हाेते. बेपत्ता, अपहरण झालेल्या मुली कधीही लपून राहत नाहीत. काेणाला न सांगताही जात नाहीत. अल्पवयीन असल्याने त्यांना तेवढी समज नसते़;मात्र ज्यांना सांगून जातात, संपर्कात असतात, त्या व्यक्तीने पाेलिसांना तातडीने माहिती दिली तर शाेध लावण्यात अडचणी येत नाहीत. यावर कधी-कधी उपाय म्हणून पाेलीस खाक्या दाखवावा लागताे.