शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात मानसिक स्वास्थ्य सांभाळणे गरजेचे : डॉ. तात्याराव लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोना महामारीला सामोरे जात आहे. कोरोना काळात मानसिक स्वास्थ्य उत्तम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोना महामारीला सामोरे जात आहे. कोरोना काळात मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ तथा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.

दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य मंडळच्यावतीने ‘कोरोना महामारी काळातील मानसिक स्वास्थ्य आणि उत्तम जीवनशैली’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत डाॅ. लहाने बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, दयानंद शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके, उपप्राचार्य डॉ. राजाराम पवार तसेच दयानंद शिक्षण संस्थेंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके यांनी करून कार्यशाळा आयोजनामागील भूमिका सांगितली. यावेळी डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, कोरोनाची सुरुवात कशी झाली हे माहिती नाही. त्यामुळे हा साथीचा रोग कधी संपेल, याबद्दल निश्चित सांगता येणार नाही. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने खूप छान पद्धतीने काम केले आहे. महाराष्ट्र हे लोकसंख्येने अतिशय मोठे राज्य आहे. मात्र, उत्तम नियोजनामुळे आपण या महामारीचा सामना योग्यरित्या करू शकलो. कोरोना काळात मानसिक स्वास्थ्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम आहार, व्यायाम आणि मानसिकता सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे. जो व्यक्ती मानसिक दृष्टीने सक्षम आहे, त्याला कसलीही भीती नसते, असेही ते म्हणाले.

या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके, उपप्राचार्य डॉ. राजाराम पवार, डाॅ. विशाल वर्मा, डॉ. स्मिता भक्कड, प्रा. योगेश शर्मा, प्रा. खदीर शेख, प्रा. श्रावण बनसोडे, प्रा. अक्षय पवार, प्रा. लहू शेंडगे, प्रा. सचिन पतंगे, प्रीतम मुळे, आदींनी परिश्रम घेतले.