शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लिंबोटीचे पाणी अहमदपुरात पोहोचले, वितरण व्यवस्थेतील त्रुटी सुटेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:20 IST

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पावरूनच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, शहरातील जुन्या फिल्टर येथे पाणी पोहोचले आहे. ...

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पावरूनच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, शहरातील जुन्या फिल्टर येथे पाणी पोहोचले आहे. मात्र, वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे शहरवासीयांना अद्याप सुरळीत पाणीपुरवठा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा अजूनही शहरवासियांना मृगजळच ठरत आहे.

तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे केवळ जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, शनिवारी पाणी शहरातील जुन्या फिल्टरमध्ये दाखल झाले. विद्युत पंप कार्यान्वित होऊन १९ दिवस झाले. १९ किमीच्या जलवाहिनीतून पाणी प्रवासासाठी पालिकेला १९ दिवस परिश्रम घ्यावे लागले. अनेक ठिकाणी गळती होणे, मोठे व्हॉल्व फुटणे, एअर वॉल बंदमुळे जलवाहिनी फुटणे असे प्रकार झाले. त्यामुळे जलवाहिनीच्या तांत्रिक दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पालिका प्रशासनाच्या प्रयत्नाने हे पाणी शहरातील जुन्या फिल्टरमध्ये आले असून आता यापुढे नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी मोठ्या फिल्टरचे काम होणे गरजेचे आहे. लिंबोटीवरील पंप पूर्णक्षमतेने अजून सुरू केले नसून, त्यांची क्षमता ६५ लाख लीटर आहे. मात्र, शहरातील फिल्टरची क्षमता केवळ ४० लक्ष लीटर प्रति दिन असल्यामुळे पाणी जास्त येऊनही फिल्टर होणार नसल्यामुळे पाणीपुरवठा नियमित व सुरळीत होणार नाही.

नवीन फिल्टरचे काम अजून सहा महिने होणार नसल्याचे कामाच्या प्रगतीवरून दिसत आहे, तसेच शहरातील वितरण प्रणालीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, २० टक्के कामामुळे वितरण प्रणालीही कार्यान्वित होणार नसल्याचे समजते. त्यामुळे अहमदपूरकरांना नियमित पाणीपुरवठ्यासाठी आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

सुरळीत पाणीपुरवठा करावा...

गुत्तेदाराने दर्जाहिन काम केल्यामुळे १९ किमीसाठी १९ दिवस लागले. शहरातील फिल्टरचे काम आणखीन सहा महिने होणार नाही. वितरण व्यवस्थेचे कामही प्रलंबित आहे. गुत्तेदाराच्या चुकीमुळे अहमदपूरकरांना सुरळीत पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नगरसेवक रवि महाजन व संदीप चौधरी यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन पालिका व गुत्तेदाराच्या निषेधार्थ २६ जानेवारी आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

नियमित पुरवठ्यासाठी वेळ लागणार...

नियमित पाणीपुरवठ्यासाठी नवीन फिल्टर व्यवस्था सुरू होणे गरजेचे आहे. सध्या जलवाहिनीची ६५ लक्ष लीटर दररोज क्षमता असताना, फिल्टर मात्र ४० लाख लीटरने काम करीत आहे. त्यामुळे शहरवासीयांना आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.