शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५ लाख ९३ हजार हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST

लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कृषी विभागाच्यावतीने ५ लाख ९३ हजार हेक्टर ५९० हेक्टर क्षेत्र ...

लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कृषी विभागाच्यावतीने ५ लाख ९३ हजार हेक्टर ५९० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित आहे. यामध्ये सर्वाधिक ४ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. यासोबतच रासायनिक खतांची १ लाख ५८ हजार मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली असून, आतापर्यंत ९६ हजार ८८० मेट्रिक टन आवंटन प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कापूस, उडीद आणि मूग ही प्रमुख पिके आहेत. खरीप हंगामासाठी क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये ४ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीन, ९० हजार हेक्टरवर तूर, १७ हजार हेक्टरवर खरीप ज्वारी, ८ हजार हेक्टरवर कापूस, ९ हजार २०० हेक्टरवर उडीद, ११ हजार हेक्टरवर मूग तर ८ हजार ३९० हेक्टरवर इतर पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ६ लाख १६ हजार ८१३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्या अनुषंगाने खते, बियाणांचे नियोजन पूर्ण झाले आहे. यंदा हवामान विभागाने मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार शेतकरीही मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. कृषी विभागाच्यावतीने तालुकानिहाय नियोजन करण्यात आले असून, बियाणे, खतांच्या नियंत्रणासाठी तालुका स्तरावर भरारी पथकांची नियुक्तीही करण्यात आली आहे, तसेच जिल्हा स्तरावर तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

१ लाख ५८ हजार मेट्रिक टन खताची गरज...

खरीप हंगामासाठी १ लाख ५८ हजार ८०० मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज आहे. यामध्ये युरिया ३४ हजार, डीएपी ४० हजार, एमओपी ७ हजार, एसएसपी २० हजार, एनपीके ५६ हजार ८०० या खतांचा समावेश आहे. आतापर्यंत ९६ हजार ८८० मेट्रिक टन मंजूर झाले आहे. त्यापैकी २५ हजार मेट्रिक टन प्राप्त झाले आहे. तर सध्या तालुकानिहाय ५३ हजार ५४० मेट्रिक टन खत शिल्लक आहे.

१ लाख २५ हजार क्विंटल बियाणाची आवश्यकता...

खरिपासाठी १ लाख २५ हजार ५० क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. त्यानुसार बियाणाची मागणी करण्यात आली आहे. सध्या ३४ हजार २०५ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, ज्वारी, मका, भुईमूग, कापूस, तीळ आदी बियाणांचा समावेश आहे. सर्वाधिक १ लाख १८ हजार १२४ क्विंटल सोयाबीन बियाणाची मागणी नाेंदविण्यात आली आहे. यामध्ये महाबीजकडून मागणीनुसार पुरवठा झाला असून, उर्वरित बियाणे लवकरच मिळणार आहेत.

कृषी विभागाची तयारी पूर्ण...

खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्यावतीने पेरणी क्षेत्र, बियाणे, रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आले आहेत; तसेच खते आणि बियाणांच्या नियंत्रणासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, अधिकच्या दराने बियाणे आणि खतांची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा. - दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.