शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाच्या दरवाढीने फोडणीला महागाईचा बसतोय तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदपूर : कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य हैराण झाले असतानाच आता जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने मोठे संकट निर्माण झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदपूर : कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य हैराण झाले असतानाच आता जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने मोठे संकट निर्माण झाले आहे. खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे फोडणीला महागाईचा तडका बसत आहे. तसेच हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या दरातही २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कोराेनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने गोरगरीब आर्थिक संकटात सापडले. दरम्यान, इंधनाच्या दरात वाढ झाली. त्याचा परिणाम माल वाहतुकीच्या दरावर झाला आहे. याशिवाय, खाद्यतेलाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे स्वीट मार्ट, बेकरी, हॉटेल आणि खानावळीतील खाद्यपदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. सध्या २० ते ३० टक्क्यांनी हे दर वाढले आहेत.

आठ महिन्यांपूर्वी फरसाण २०० रुपये किलो दराने मिळत होते, ते आता २४० रुपये दराने मिळत आहे. शेवच्या दरात ५० रुपयांनी वाढ होऊन २५० रुपये किलो दराने ती मिळत आहे. बाकरवडीच्या दरात २५ रुपये, पापडीच्या दरात २५ रुपये, जिलेबीच्या दरात २० रुपये, चिप्सच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली आहे. खाद्यतेलालाच महागाईची फोडणी बसली आहे. खाद्यतेलाचे दर वाढल्याने गृहिणींसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पालेभाज्यांबरोबर आता कडधान्ये व डाळींचे दरही वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे.

१५ किलोच्या तेल डब्यासाठी २०० रुपये ज्यादा...

एप्रिलच्या तुलनेत सूर्यफूल, सोयाबीन तेलाच्या १५ किलोच्या डब्यासाठी आता २०० ते २५० रुपये ज्यादा मोजावे लागत आहेत. बहुतांश कुटुंबांमध्ये सूर्यफुल व सोयाबीनच्या तेलाचा वापर केला जातो. भाजीची फोडणी ही तेलावर अवलंबून असते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

कोरोना काळातच दरवाढ...

काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. लॉकडाऊनमध्ये काही दुकानदारांकडून ग्राहकांना ज्यादा दराने किराणा साहित्याची विक्री करण्यात आली. त्यात प्रामुख्याने खाद्यतेल, डाळ, शेंगदाणा आदींचा समावेश होता. डाळी महागल्या तर पालेभाज्यांचा पर्याय आहे. परंतु, खाद्यतेलाशिवाय स्वयंपाकच होऊ शकत नाही. कोरोना काळात खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

सर्वसामान्यांची चव महागली...

वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. लज्जतदार आणि चटकदार पदार्थांचे दर वाढले आहेत. फरसाण, शेव, बाकरवडी, पापडीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांची चव महागली आहे. कुटुंबात खाद्यतेलाचा कमीत कमी वापर करण्यात येत आहे.

खाद्यतेलाच्या किमती वाढल्या...

एप्रिलमध्ये सूर्यफुलाच्या १५ किलोच्या डब्याला २७६०, सोयाबीन २२४०, शेंगदाणा तेलाला २७४० रुपये मोजावे लागत होते. जूनमध्ये सूर्यफुलाच्या डब्याला २६९०, सोयाबीनच्या २४५०, शेंगदाणा तेलासाठी २७०० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच बाजारपेठेत तूरडाळ १०० रुपये प्रतिकिलो, मूगडाळ १०० रुपये, मसूरडाळ ७५ रुपये, उडीदडाळ १०० रुपये, चणाडाळीची ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे.