शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

औराद शहाजानी परिसरात परतीच्या पावसाने सिंचनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात यंदा परतीचा जोरदार पाऊस झाला. परिणामी, या पावसाने या परिसरातील तेरणा आणि मांजरा नदी ...

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात यंदा परतीचा जोरदार पाऊस झाला. परिणामी, या पावसाने या परिसरातील तेरणा आणि मांजरा नदी पूर्ण क्षमतेने दुथडी भरून वाहिल्या. या नद्यावरील औराद, तगरखेडा, सोनखेड, मदनसुरी, लिंबाळा, वांजरखेडा, किल्लारीसह सर्व उच्चस्तरीय आणि कोल्हापुरी बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला होता. याशिवाय, या परिसरातील लघु साठवण तलाव, विहीर, विंधन विहीरींना चांगला पाणी उपसा करण्यासाठी उपलब्ध झाला. यातून यंदा तेरणा नदीवरील बंधाऱ्यात असलेल्या पाण्याचा वापर शेतीच्या सिंचन वाढीसाठी महत्वाचा ठरला आहे. यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा, ऊस, भाजीपाला, फळबागा या क्षेत्राचे लागवड क्षेत्र वाढले. उत्पादनाची वाढ झाली आहे. बारमाही पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून, ऊस पिकाची लागवड यावर्षी वाढली आहे. याशिवाय भाजीपाला क्षेत्रात आणि फळबाग क्षेत्रात लागवडीचे क्षेत्र दुपटीने वाढले आहेत. तर कोरडवाहू घेणारा शेतकरी या पाण्याचा लाभ काही शेतीला झाल्याने रब्बी उत्पादन वाढीस फायदा झाला आहे. परिसरात भाजीपाला क्षेत्रात टोमॅटो, वांगी, शिमला, मिरची, साधी मिरची, फूलकाेबी, दोडका आदी भाजीपाला लागवड क्षेत्र वाढले आहे. याशिवाय, सिताफळ खरबूज, टरबूज, पपई याची लागवडही वाढली आहे.

नदीकाठावरील शेतीला झाला फायदा...

औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा नदीकाठावरील १ हजार २७५ हेक्टर क्षेत्र यंदाच्या हंगामात सिंचनाखाली आले आहे. तर विहीर, विंधन विहीर, तळे आणि तलाव या भागातील शेतीलाही पाणी साठा झाल्याने जवळपास ६०० हेक्टर सिंचनाचा हंगामी लाभ घेतला आहे. तेरणा नदीवरील पाटबंधारे बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा यंदा झाल्याने जवळपास बाराशे ७५ हेक्टर शेती सिंचनाचा लाभ झाल्याचे जलसिंचन शाखाधिकारी एस.आर. मुळे म्हणाले,

रब्बी उत्पादन वाढले असल्याचे मंडळ कृषी अधिकारी एच.एम. पाटील म्हणाले. यंदा परतीचा चांगला पाऊस झाल्याने रब्बी क्षेत्रातील ज्वारी गहू, हरभरा, ऊसासह भाजीपाला, फळबागा यांचे उत्पादन वाढले आहे.

बाजारात भाव नसल्याने नुकसान...

भाजीपाला उत्पादन वाढले पण कोरोनाच्या महामारीने बाजारपेठ बंद राहिल्या आहेत. बाजारात ग्राहक नसल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले आहे. परिणामी, उत्पादन वाढले असले तरी शेतीमाल मात्र शेतीच्या बांधावरच पडून आहे. असे शेतकरी विठ्ठल अंचुळे म्हणाले. शेवटच्या टप्प्यात आती पाऊस झाल्याने

हाताशी आलेले तुरीच्या पिकाचेही नुकसान झाले. हे रब्बी हंगामातील पिकाचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. झालेली नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेकडाे शेतकरी सध्याला आर्थिक संकटात सापडले आहेत.