शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन एज्युकेशनमुळे पालकांचा वाढला खर्च; मोबाईल, टॅब, इंटरनेटची भर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST

लातूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शाळा-महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहावे लागत असल्याने पालकांचा अतिरिक्त खर्च वाढला ...

लातूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शाळा-महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहावे लागत असल्याने पालकांचा अतिरिक्त खर्च वाढला असून, मोबाईल, टॅब, इंटरनेट, लॅपटॉपवर खर्च करावा लागत आहे. नेटवर दोनशे तर मोबाईलसाठी साधारण १५ ते २० हजार रुपयांचा खर्च प्रत्येक पालकाला करावा लागला आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीची विद्यार्थी संख्या ५ लाख ५० हजार २३४ इतकी आहे. यातील दहावीची विद्यार्थी संख्या ४७ हजार २९४ आहे तर बारावीची ३६७ हजार ४१८ इतकी आहे. या दोन वर्गांचा विचार केला तर प्रत्येक पालकांना ५० हजारांच्या पुढे साहित्य खरेदीसाठी खर्च करावा लागला आहे. नववी ते पहिलीपर्यंत घरातील कोणत्याही सदस्याच्या मोबाईलवर काही पालक भागवत आहेत, तर काही पालकांनी स्वतंत्र खर्च केला आहे. एकंदर, ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांचा अतिरिक्त खर्च वाढला आहे. प्रस्तुत विद्यार्थी संख्या मराठी माध्यमांच्या शाळांची आहे. इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांवर तर पालकांना यापेक्षा अधिक खर्च करावा लागला आहे.

मोबाईल, संगणक आणि इंटरनेट

गेल्या दोन वर्षांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन शिकवणी वर्ग आहेत. त्यामुळे प्रत्येक पाल्याला मोबाईल किंवा संगणक द्यावा लागला आहे. त्यासाठी इंटरनेटचा खर्च वाढला. महिन्याला किमान दोनशे रुपये इंटरनेटवर खर्च होतो.

इंटरनेट पॅक संपल्यानंतर वर्ग बंद होण्याची भीती असते. त्यामुळे पॅक संपण्याअगोदर बॅलन्स टाकण्यासाठी मुलांची पालकांकडे मागणी होत आहे. प्रत्येक घरामध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

मुलगी अकरावीला आहे. आता तिने लॅपटॉपची डिमांड केली आहे. मोबाईलवर त्रास होतो, असे तिचे म्हणणे होते. त्यामुळे लॅपटॉप खरेदी करावा लागला. ५० हजारांच्या पुढे खर्च आला. पर्यायच नसल्यामुळे लॅपटॉप घ्यावा लागला. - बालाजी होदाडे

मोबाईल, इंटरनेटचा खर्च वाढला असून, मुलांची अडचण होऊ नये म्हणून दोघांसाठी दोन मोबाईल घ्यावे लागले. त्यासाठी आर्थिक झळ सोसावी लागली. मोबाईल घेतला नसता तर त्यांचे वर्ग बुडाले असते. ऑनलाईन शिक्षणाशिवाय सध्या तरी पर्याय नाही. - साहेबराव निकाळजे

मुलांची एकाग्रता कमी

स्क्रीन टाईम वाढल्यामुळे मुलांची एकाग्रता कमी होण्याचा धोका आहे. लॉकडाऊनमुळे त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज बंद झाल्या आहेत. मित्रांशी संवादही कमी आहे. त्यामुळे त्यांच्यात चिडचिडेपणा येतोय. ऑनलाईन शिक्षणामध्ये नॉर्मल स्कूलचे वातावरण नाही. तिसऱ्या लाटेचे पालकांनी जास्तच मनावर घेतल्याने मुलांना बाहेर सोडले जात नाही. याचाही मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. - डॉ. आशिष चेपुरे, मानसोपचार तज्ज्ञ

पहिली ४६,७७८

दुसरी ४६,७३३

तिसरी ४६,२२१

चौथी ४७,६९९

पाचवी ४९,२१५

सहावी ४८,४८८

सातवी ४९,६३७

आठवी ४९,२९३

नववी ४८,४६५

दहावी ४७,२९४