शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

उजनीचे पाणी लातूरला देण्याचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST

परिवार संवादयात्रेच्या निमित्ताने लातुरात आलेल्या पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी लातूर जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर बाेलताना ते म्हणाले, मांजरा, तेरणा ...

परिवार संवादयात्रेच्या निमित्ताने लातुरात आलेल्या पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी लातूर जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर बाेलताना ते म्हणाले, मांजरा, तेरणा नद्यांवरील सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण झाली आहेत. ऊर्ध्व मनार सिंचन प्रकल्पासाठी ३८ काेटींची मागणी आहे. लातूर जिल्ह्यात १६ काेल्हापुरी बंधाऱ्यांचे रुपांतर आता बॅरेजेसमध्ये करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील तीरू नदीवरील ७ बंधाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्याचा पाणीसाठा ३० टीएमसी आहे. ३० टीएमसीपर्यंतचे सर्व माेठे तलाव येथे आहेत. ते पाणी अडविण्याचे प्रयत्न सुरू असून, लातूर जिल्ह्यात ज्या भागात कमी पाऊस पडताे, तेथे पाण्याचे संतुलन करण्याचे ठरविले आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे जाते. ते पाणी उचलून लातूर-उस्मानाबाद-बीड जिल्ह्यांसाठी वळण बंधाऱ्यातून आणण्याचा प्रयत्न आहे. यातून १० टीएमसी पाणी वळविण्यात येणार आहे. वैतरणी, कुकडी धरणांतील १६ ते १७ टीएमसी पाणी धरणे बांधून जायकवाडी धरणात आणता येणार आहे. अतिरिक्त पाणी माजलगाव धरणातून लातूर, बीड आणि उस्मानाबादसाठी आणता येणार आहे. यातून मराठवाड्यासाठी जादा पाणीवहन करण्याचा प्रकल्प अस्तित्वात येईल. लातूरला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उजनीतून करण्यात यावी, अशी मागणी आहे. याबाबत लवादाच्या तज्ज्ञांशी चर्चा करून, कायदेशीर बाबी तपासून याबाबत निर्णय घेतला जणार आहे. त्यासाठी सध्या अभ्यास करावा लागणार आहे, असेही जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसाेडे, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

केंद्रीय यंत्रणांकडून त्रास देण्याचा प्रयत्न...

अनिल देशमुख यांच्यासह आघाडी सरकारमधील मंत्र्यांना जाणीवपूर्वक ईडीचा वापर करून त्रास देण्याचा प्रयत्न हाेत आहे. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्राच्या यंत्रणांकडून केला जात आहे. अनिल देशमुख यांच्याबाबतीत पंधरा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात पुन्हा चाैकशी केली जात आहे. यातून केवळ त्रास देणे, अडचणीत आणण्याचा हेतू समाेर आला आहे, असेही जलसंपदामंत्री पाटील म्हणाले.