शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकीची दुचाकीला धडक; एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST

बनीम का जाळलास म्हणून मारहाण लातूर : गेल्या वर्षी सोयाबीनची बनीम जाळल्याच्या कारणावरून संगनमत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ...

बनीम का जाळलास म्हणून मारहाण

लातूर : गेल्या वर्षी सोयाबीनची बनीम जाळल्याच्या कारणावरून संगनमत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शिरूर अनंतपाळ तालुक्यातील वळसांगवी येथे १३ मार्च रोजी घडली. याप्रकरणी फिर्यादी दशरथ रंगराव बिरादार यांच्या तक्रारीवरून कालिदास भीमराव बिरादार व सोबत असलेल्या दोघांविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी करीत आहेत.

खाडगाव परिसरात मोकळ्या प्लॉटवर कचरा

लातूर : शहरातील खाडगाव परिसरात मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. घंटागाडी येत नसल्याने रस्त्याच्या कडेला, मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने नियमित घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

उड्डाणपुलाच्या भिंतीची रंगरंगोटी मोहीम

लातूर : शहरातील उड्डाण पुलाच्या रंगरंगोटीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वच्छ शहर सुंदर शहर या उपक्रमांतर्गत आकर्षक रंगरंगोटी केली जात आहे. विविध प्रकारचे संदेश देणारी चित्र रेखाटली जात असून, वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत आहे. आतापर्यंत अर्धे काम पूर्ण झाले असून, लवकरच संपूर्ण रंगरंगोटी पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

शहरातील बाजारात भाजीपाल्याची आवक

लातूर : शहरातील भाजीपाला बाजारात शेतमालाची आवक वाढली आहे. दररोज सायंकाळच्या वेळी ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी दाखल होत आहे. आवक वाढली असल्याने दरही स्थिर आहेत. यासोबतच उन्हाचा पारा वाढत असल्याने रसाळ फळांना मागणी होत आहे. टरबूज, द्राक्ष, सफरचंद, मोसंबी, संत्री आदी फळांना ग्राहकांची पसंती आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत व्यवहार पार पाडले जात आहेत.

शहरात रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणी

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात रात्री ८ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी पुकारण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील बार्शी रोड, रेणापूर नाका, औसा रोड, नांदेड नाका आदी भागात वाहनांच्या तपासणीसाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.