शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

बार्शी-मुरुड राज्य मार्गावरील पुलावरून कार कोसळून ५ ठार, २ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 6:54 PM

बार्शी-मुरुड राज्य मार्गावरील मुरुड-अकोला नजिक पुलावरून भरधाव वेगातील कार सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोसळली. या भीषण अपघातात कारमधील ५ जण जागीच ठार झाले असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

लातूर : बार्शी-मुरुड राज्य मार्गावरील मुरुड-अकोला नजिक पुलावरून भरधाव वेगातील कार सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोसळली. या भीषण अपघातात कारमधील ५ जण जागीच ठार झाले असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृत व जखमी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी आहेत. जखमींना सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.कळंब तालुक्यातील डिकसळ येथून ७ जण ढोकी-मुरुड मार्गे लातूरला कारने लग्नाला येत होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार मुरुड-अकोला नजिक असलेल्या पुलावरून खाली कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की कार १५ फूट खोल खड्ड्यात पडल्याने चेंदामेंदा झाली. त्यात ज्ञानेश्वर बब्रुवान खंदारे (२५), परमेश्वर ज्योतिबा अंबिरकर (३२, चालक), जगन्नाथ चंद्रकांत पवार (३२, तिघेही रा. डिकसळ, ता. कळंब), गणेश मनोहर सोमासे (३१, रा. खडकी, ता. कळंब), जरचंद हरिभाऊ शिंदे (३५, रा. युसुफ वडगाव, ता. केज) हे पाच जण जागीच ठार झाले. तर श्रीकांत अंबिरकर, दत्तात्रय जाधव हे दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मयतांचे शवविच्छेदन शासकीय सर्वोपचार रुग्णालयात सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Accidentअपघात