शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपुरातील साडेपाच हजार शेतकऱ्यांना मिळाली कर्जमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST

अहमदपूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत अहमदपूर ...

अहमदपूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत अहमदपूर तालुक्यातील ५ हजार ३९९ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३० कोटी ८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत, तर आधार प्रमाणीकरणाअभावी १८६ शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित आहेत.

अहमदपूर तालुक्यात महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ५ हजार ६९३ शेतकरी पात्र होते. त्यातील ५ हजार ५०७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीपोटी शासनाच्या वतीने ३० कोटी ८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. यामध्ये बँक ऑफ इंडिया १४९ खातेदार १ कोटी ७० लाख, बँक ऑफ महाराष्ट्र ८८१ खातेदार ६ कोटी ३२ लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १०१ खातेदार १ कोटी ४२ लाख, एचडीएफसी बँक ६ खातेदार २२ लाख, आयसीआयसीआय बँक १ खातेदार १ लाख, आयडीबीआय बँक १६ खातेदार १ कोटी, इंडियन ओव्हरसीज बँक २९५ खातेदार २ कोटी ५४ लाख, तर जिल्हा मध्यवर्ती बँक सर्व शाखांमधील २ हजार ३४१ खातेदार ७ कोटी ६० लाख, महाराष्ट्र ग्रामीण बँक ४३६ खातेदार ३ कोटी ६९ लाख, पंजाब नॅशनल बँकेच्या एका खातेदाराच्या नावावर २ लाख, तर बँक ऑफ इंडियाच्या १ हजार ८१ खातेदारांच्या नावावर ७ कोटी १६ लाख रुपये शासनाच्या वतीने कर्जमुक्तीपोटी जमा करण्यात आले आहेत.

आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

अहमदपूर तालुक्यातील १८६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिले आहे. परिणामी, सदरील शेतकरी कर्जमुक्ती, तसेच नवीन पीक कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे महा- ई- सेवा केंद्र येथे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी केले आहे.

कर्ज वितरणासाठी बँकांकडे पाठपुरावा

खरीप हंगाम जवळ आला असून, कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्जपुरवठा करावा यासाठी बँकांकडे पाठपुरावा केला जात आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती यादी मध्येनाव आहे व त्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांना पुढील वर्षासाठी बँकेच्या वतीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी बँकेकडे प्रस्ताव पाठवावेत, असे सहायक निबंधक वसंत घुले यांनी सांगितले.