शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संसर्गाची भीती अन् पाण्यासाठी एकच होतेय गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:17 IST

औसा तालुक्यातील किल्लारी हे शहरवजा गाव आहे. गावची लोकसंख्या जवळपास ३० हजार आहे. गावात मोठी बाजारपेठ, आडत बाजार, बँका, ...

औसा तालुक्यातील किल्लारी हे शहरवजा गाव आहे. गावची लोकसंख्या जवळपास ३० हजार आहे. गावात मोठी बाजारपेठ, आडत बाजार, बँका, शाळा, महाविद्यालये, ग्रामीण रुग्णालय आहे. त्यामुळे किल्लारीशी दररोज ४० पेक्षा अधिक गावांतील नागरिकांचा संपर्क असतो. गावच्या पाणीपुरवठ्यासाठी शासनाने माकणी प्रकल्पावरून ३० खेडी पाणीपुरवठा योजना राबविली आहे. परंतु, जलवाहिनीस बरीच वर्षे झाल्याने आणि ती चांगल्या दर्जाची नसल्याने सतत फुटत असते. त्याचबरोबर सतत विद्युत मोटार जळण्याचे प्रमाणही आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना सतत पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

काही दिवसांपूर्वी किल्लारीस पाणीपुरवठा करणाऱ्या माळकोंडजी येथील जलकुंभाच्या जलवाहिनीला ४० टक्के गळती लागली होती. त्यामुळे बरेच दिवस दुरुस्तीसाठी लागले. त्यांन दोनच दिवस गावांत पाणी आले. गावातील काही गल्लीत पाणी पोहोचले तर काही गल्लीत पोहोचले नाही. दरम्यान, ‘महावितरण’ने थकीत वीजबिलापोटी २४ फेब्रुवारीला वीजपुरवठा तोडला. परिणामी, गावातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू झाले.

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे; परंतु, किल्लारी येथे पाण्याची समस्या असल्याने पाणी असलेल्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी...

सध्या किल्लारीत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ‘महावितरण’ने थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा तोडल्याने प्रकल्पात पाणी असूनही गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पालकमंत्री अमित देशमुख यांनी याकडे लक्ष देऊन ‘महावितरण’ला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

१२५ रुपयांस ५०० लिटर पाणी...

गावात पाण्याची समस्या असल्याने नागरिकांना १२५ रुपयांना ५०० लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. अनेकदा पाण्यासाठी आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पाण्यासाठी गोरगरिब नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.

पाणीपट्टी वसुलीची अडचण...

गावातील नागरिक पाण्यासाठी फिरत आहेत. सध्या पाणीपट्टी वसुलीवर भर देण्यात येत आहे; परंतु, कोरोनाच्या संकटामुळे हाताला काम नसल्याने नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.

- शैलाताई लोव्हार, सरपंच

वीजपुरवठा सुरळीत होणे गरजेचे...

‘महावितरण’ने वीजपुरवठा जोडल्यास तात्काळ पाणीपुरवठा करण्यात येईल. या योजनेचे बिल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरण्यात येते, असे माकणी प्रकल्पावरील अभियंता संगाप्पा कपाळे यांनी सांगितले.