शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पिके कोमेजू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:14 IST

औराद शहाजनी : मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर गत आठवड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे ...

औराद शहाजनी : मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर गत आठवड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे अन्य काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. मात्र, सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने आणि तापमान वाढल्याने उगवलेली पिके कोमेजू लागली आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी परिसरात जूनच्या सुरुवातीला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. दरम्यान, गत आठवड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या पावसावर पेरणीला वेग आला होता. मात्र, आता पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जूनमध्ये केवळ दोनदाच मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नाही. त्यानंतर पाऊस नसल्याने ओलावा टिकून राहिला नाही. त्यातच वारे वाहू लागल्याने आणि कडक उन्हामुळे पाण्याअभावी पिके माना टाकू लागली आहेत.

खरीप पिकांबरोबरच भाजीपाल्याचीही हीच अवस्था झाली आहे. थ्रिप्स, करपा, भुरीसारखे रोग भाजीपाला, फळबागांना त्रासदायक ठरत आहेत. पावसात खंड पडल्याने शेतकरी हतबल झाला आहे. महागामोलाची बी-बियाणे, खते खरेदी करुन पेरणी केल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, साठवण तलावात पुरेसा मुबलक पाणीसाठा उपलब्ध नाही. काही शेतकरी उपलब्ध पाण्यावर स्प्रिंकलरने पाणी देत आहेत.

जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप पाऊस झालेला नाही. त्यातच कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. कधी ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी जोराच्या वाऱ्यामुळे ढग पुढे निघून जात आहेत.