शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही ३ हजार टपालांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST

चापोली : सोशल मीडियाच्या काळातही टपालाद्वारे सुख-दुःखाचा निरोप घरपोच पोहोचविण्याचे कार्य पोस्टमन करीत आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळातही हे काम ...

चापोली : सोशल मीडियाच्या काळातही टपालाद्वारे सुख-दुःखाचा निरोप घरपोच पोहोचविण्याचे कार्य पोस्टमन करीत आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळातही हे काम अविरत सुरू आहे. चापोली पोष्टाअंतर्गत दीड महिन्यात ३ हजार टपालांचे वितरण करण्यात आले आहे.

डाक विभागाची सेवा अत्यावश्यक सेवेत आहे. नातेवाइकांनी आपल्या दुसऱ्या नातेवाइकांना टपालाद्वारे पाठविलेले निरोप पोस्टमन पायाच्या टाचा झिजवित कोरोनाच्या संकटातही सुरूच आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट सुरू आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत टपाल कर्मचारी एकही पत्र अथवा इतर टपाल गहाळ न करता नागरिकांच्या दारापर्यंत पोहोच करीत आहेत.

चापोली पोस्ट कार्यालयाअंतर्गत एक पोस्टमन, एक पोस्ट मास्तर तसेच हिप्पळनेर व उमरगा कोर्ट येथे प्रत्येकी एक एबीएम असे ४ कर्मचारी आहेत. नागरिकांना त्यांचे महत्त्वाचे टपाल, रजिस्टर स्पीड पोस्ट, पार्सल वितरण, ज्येष्ठांचे पेन्शन घरपोच देणे, सरकारच्या विविध योजनांचे पैसे नागरिकांना घरपोच देणे तसेच औषधींही घरपोच देण्याचे काम संकटकाळातही पोस्टमन करीत आहेत.

चेहऱ्यास मास्क लावून सकाळी पोस्ट कार्यालयात आलेला पोस्टमन प्रथम सॅनिटायझर करतात. मग पोस्टात आलेल्या टपालांची क्रमवारी करण्यासाठी बीटनिहाय त्यांचे वेगवेगळे गट तयार करतात. त्यानंतर संगणकीय नोंदणी करून बीटनुसार वितरणासाठी तयार होतात. सध्या कोरोनाच्या संकटात पोस्टाकडून विंडो डिलेव्हरी सेवा सुरू आहे. आपल्या पिशवीत सॅनिटायझर बाटली ठेऊन पोस्टमन घरोघरी जाऊन टपाल वाटप करीत आहेत.

तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा...

गत दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, टपाल कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहे. चाकूर तालुक्यात ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते ठणठणीत बरे होऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

निष्ठेने कर्तव्य सुरू...

दीड वर्षापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. त्यात प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. कोरोनामुळे मनात भीती होती. सुरुवातीचे आणि आताचे दिवस भीतीदायक वातावरण आहेत. पण, कर्तव्य तर पार पाडावेच लागणार. कुटुंबातील सदस्यांनाही नेहमी काळजी रहायची. पण, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले.

- बालाजी होनराव, पोस्ट मास्टर, चापोली.

विविध प्रश्न भेडसावयाचे...

कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना पत्र देणे हे खरोखरच खूप कठीण होते. लोक काय म्हणतील, आपल्यावर दारात उभे करतील की नाही, ही भीती सतत मनात राहत होती; पण कोरोनाच्या संकटातही आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे.

- सुखदेव जाधव, पोस्टमन