शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, मोबाइलवेडाने उडविली झोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST

लातूर : लॉकडाऊन काळात अनेकांना घरीच राहावे लागले. त्यामुळे विरंगुळा म्हणून मोबाइलचा वापर वाढला आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेकांची झोप ...

लातूर : लॉकडाऊन काळात अनेकांना घरीच राहावे लागले. त्यामुळे विरंगुळा म्हणून मोबाइलचा वापर वाढला आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेकांची झोप उडाली असून, निद्रानाशेची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकजण झोप येत नसल्याच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जात आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात आले; परंतु परत रुग्णसंख्या वाढू लागल्याने निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे अनेकांना वर्क फ्रॉम होम तर काही जणांना घरीच राहावे लागले. अनेकांचे व्यवसाय, उद्योग बंद असल्याने दिवसभर घरीच राहत विरंगुळा व्हावा, यासाठी अनेकांनी मोबाइलचा वापर वाढविला, तर लहान मुलांचा अभ्यासक्रमही ऑनलाइन झाल्यामुळे मुलांमध्ये मोबाइल वापराचे प्रमाण वाढले. रात्री उशिरापर्यंत मोबाइल हाताळल्यामुळे पुरेशी झोप येत नाही. यातून लहान मुलांसोबतच तरुण वर्गालाही निद्रानाशेची समस्या जाणवू लागली आहे. अपुऱ्या झोपेमुळे मधुमेह, थॉयराॅइड, मानसिक आजार होण्याचा धोका आहे. त्यामुळे योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम...

पुरेशी झोप न झाल्याने निद्रानाशाची समस्या उद्‌भवते.

झोप नसल्याने चिडचिडेपणा वाढतो.

लहान मुलांच्या जडणघडणीवर परिणाम होतो.

मधुमेह, मानसिक आजार होण्याची शक्यता असते.

गेल्या काही दिवसांपासून अनेकांचा मोबाइलचा वापर वाढला आहे. घरी विरंगुळा म्हणून मोबाइलचा वापर केला जातो. बाहेर निर्बंध असल्याने अनेकजण बाहेर जाणे टाळतात. त्यामुळे मोबाइलचा वापर कमी करणे गरजेचे आहे.

झोप का उडते

१. मेलॅनिन संप्रेरक कमी झाल्याने निद्रानाशेची समस्या उद्‌भवत असते. डोमामाइन रसायन कमी झाल्याने झोप लागत नाही.

२. रात्री झोपण्यापूर्वी तेलकट व पचनास जड अन्नाचे सेवन केल्यामुळे व्यवस्थित झोप होत नाही.

३. बेडरूमचा वापर केवळ झोपण्यासाठी करणे गरजेचे असते. मात्र, अनेकजण बेडरूममध्ये जेवण करतात. त्यामुळे झोपेसाठी पोषक वातावरण राहत नाही.

४. झोपण्यापूर्वी मोबाइलचा अतिवापर केल्याने डोळ्यांवर प्रकाश पडल्याने मेंदूला ॲक्टिव्ह केले जाते. त्यामुळे झोप उडते.

नेमकी किती झोप हवी?

नवजात बाळ १६ ते १८ तास

१ ते ५ वर्षे १० ते १२ तास

शाळेत जाणारी मुले १० ते १२ तास

२१ ते ४० वयोगट ७ ते ९ तास

४१ ते ६० वयोगट ७ ते ९ तास

६१ पेक्षा जास्त ७ ते ९ तास

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको

अनेकजण झोप येत नसल्यामुळे स्वत:हून झोपेच्या गोळ्या घेत असतात. काही कालावधीनंतर अशा गोळ्या घेण्याची शरीराला सवय लागून जाते. गोळ्यांचा अतिरेक झाल्याने छातीत धडधडणे, श्वास मंदावणे, कामात मन न लागणे, थकवा, चक्कर येणे अशा समस्या उद्‌भवत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

झोपण्यापूर्वी आवडीचे संगीत ऐकावे

रात्री जड अन्न खाणे टाळावे

झोपण्याअगोदर दोन तास मोबाइल दूर ठेवावा

सकाळी योगा आणि व्यायाम करावा.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम, योगा आणि संतुलित आहार गरजेचा आहे. त्याच तुलनेत झोपही आवश्यक आहे. झोप झाली तरच शारीरिक आणि मानसिक संतुलन व्यवस्थित राखले जाते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.