शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर बदलले घराघरांतील किचन; हेल्दी पदार्थ वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे. गृहिणी घरातील सदस्यांना सकस व पौष्टिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे. गृहिणी घरातील सदस्यांना सकस व पौष्टिक आहार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पालेभाज्या, कडधान्ये, दुधाचे पदार्थ बनविण्यावर भर देत असल्याचे चित्र घरोघरी पाहावयास मिळत आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. सर्वच वयोगटांतील नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. प्रत्येक व्यक्ती आरोग्याकडे लक्ष देत असून, गृहिणीही कुटुंबातील सदस्यांना सकस व पौष्टिक आहार देण्यावर भर देत आहेत. कोरोनापूर्वी तळलेल्या तसेच चटपटीत पदार्थांवर अधिक भर असायचा. मात्र त्यामध्ये आता घट झाली असल्याचे चित्र आहे. आहारात डाळी, भाज्यांचा समावेश केला असल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे.

कच्च्या भाज्या, कडधान्ये

१. तंतुमय पदार्थ रोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक आहे. पचनक्रिया याशिवाय सुरळीत होऊ शकत नाही. दरम्यान, कोशिंबीर, कच्च्या भाज्यांचे ज्यूस, मोड आलेल्या कडधान्यांचा वापर केला जात आहे.

२. मटकी, वाटाणे, हरभरे असे पदार्थही आहारात वापरले जात आहेत. या आहारामुळे प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबर पचनक्रियाही चांगली राहते.

३. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या आहारात व्हिटॅमिन सी, लिंबू, आवळा, पालेभाज्या, फळे, डाळी, उसळ, पनीर, दूध, अंडी, चिकन, मटण, सोयाबीनच्या पदार्थांचा जेवणात समावेश व्हावा.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात हे हवेच. शरीराला ऊर्जा मिळावी, यासाठी वाटाणे, हरभरा, शेंगदाणे आणि मटकीचाही वापर करायला हवा.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबू, आवळा, फळे, डाळी, उसळ, पनीर, दूध, अंडी, चिकन, मटण यांचा रोजच्या आहारात समावेश असल्यास प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते.

मेथी, पालक, शेपू, चुका अशा भाज्यांबरोबर ऋतूनुसार बाजारात उपलब्ध फळांचा आहारात समावेश असणे गरजेचे असल्याचे आहारतज्ज्ञांनी सांगितले.

फास्टफूडवर अघोषित बंदी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हॉटेल बंद होते. त्यामुळे पिझ्झा, बर्गर, समोसे, आदी चटपटीत पदार्थांसह तळलेले पदार्थ खाण्यावर बंधने आली आहेत. तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेकजण आपल्या मुलांना फास्ट फूडपासून दूर ठेवत असल्याचे गृहिणींनी सांगितले.

गृहिणी म्हणतात...

कोरोनामुळे सर्वांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. आहाराच्या पद्धतीही बदलल्या आहेत. प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या घटकांवर अधिक भर दिला जात आहे. आहाराचे महत्त्व लक्षात आले असून, कडधान्यांचा वापर केला जात आहे. तसेच सोयाबीनच्या पदार्थांचाही वापर करतो.

- आशा कांबळे, गृहिणी

मुलांना तळलेले पदार्थ आवडतात. मात्र तेलकट असल्याने खोकल्याचा त्रास उद्‌भवू शकतो. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून तळलेले पदार्थ देणे बंद केले आहे. मुलांना वाटाणे, मटकी, हरभरा यांचा आहार दिला जात असल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

- शुभांगी साळुंके, गृहिणी

सध्या तेल कमी वापरून पालेभाज्या, मोड आलेले धान्य, पनीर असे पदार्थ बनविले जात आहेत. तेलकट पदार्थ खाणे कमी केले असून, प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आहारावर अधिक भर दिला जात आहे. कोरोनामुळे प्रत्येकाच्या आहारात बदल झाला आहे.

- राणी ढोले, गृहिणी