शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाची ‘भाकरी’वरच संक्रांत, २५ हजार माेलकरणींना ‘दार’ बंद ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:18 IST

घर कसे चालवायचे याचीची चिंता... लातूर जिल्ह्यातील तब्ब्ल २५ हजार माेलकरणींच्या हातचे काम काेराेनाच्या काळात गेले आहे. परिणामी, त्यांना ...

घर कसे चालवायचे याचीची चिंता...

लातूर जिल्ह्यातील तब्ब्ल २५ हजार माेलकरणींच्या हातचे काम काेराेनाच्या काळात गेले आहे. परिणामी, त्यांना घर कसे चालवायचे हाच यक्ष प्रश्न सतावत आहे. याच चिंतेने अनेक कुटुंबीयांची परवड सुरु झाली आहे. त्यासाठी घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ-कायदा २००८ मध्ये अस्तित्वात आला. मात्र, या कायद्याची अंमलबजावीण हाेताना दिसून येत नाही. काेराेनाच्या काळात मालकरणी, घरेलू कामगारांना शासनाकडून विशेष अनुदान देण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी तातडीने सानुग्रह अनुदान देण्याची मागणी हाेत आहे.

एका कामासाठी ८०० रुपये...

घरकामामध्ये धुणी, भांडी आणि साफसफाइ अशी वर्गवारी आहे. प्रति कामाला महिन्याकाठी ८०० रुपये माेबदला मिळताे. काही ठिकाणी हे तीनही आणि पूर्णवेळ काम मिळते. तेथे माेलकरणीस ३ ते ४ हजारांचा माेबदला दिला जाताे. एका माेलकरणीस किमान चार ते पाच घरचे काम करावे लागते. तेव्हा कुठे घरप्रपंच भागताे. एक महिला किमान महिन्याला ५ ते ६ हजार रुपये ओढाताण करुन कमवते. याच तुटपुंज्या अर्थकारणावरच कुटुंबाचा गाडा हाकला जाताे. आता मात्र, काेराेनाला या गाड्यालाच खिळ बसली आहे.

सह जणांचे पाेट भरणार कसे...

आमच्या घरात चार मुले आणि आम्ही दाेघे असे एकूण सहा जण आहाेत. पती मिळेल ते काम करात असत आणि मी घरकाम करत असे. आमच्या दाेघांच्या मेहनतीतून घर भागत हाेतं. मात्र, काेराेनाने आमच्या हातचे कामच गेले आहे. अशा संकटसमयी जगायचं कसं, हाच प्रश्न आम्हाला रात्रं-दिन सतावत आहे. शासनाने तातडीने अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे.

सुनिताबाइ, कामगार

मी विधवा, परितक्त्या आहे. लातुरात मी एकटीच राहते. मुलांच्या शिक्षणासाठी मी घरकाम करत हाेते. आता ते कामही काेरानाच्या महामारीने बंद आहे. अशा स्थितीत जगणार कसे, हा गंभीर प्रश्न आहे. मुलांचे शिक्षणही आता थांबले आहे. महिन्याकाठी मिळणारे आर्थिक उत्पन्न ठप्प झाल्याने, दाेनवेळच्या भाकरीचे वांदे झाले आलेत.

अनिताबाइ, कामगार

लातूर शहरात मी गेल्या अनेक वर्षांपासून घरकाम करुन घरप्रपंच चालविते. गत मार्चपासून हे कामच बंद झाले आहे. चार-पाच घरातील धुणी-भांडी केल्यानंतर मला जवळपास ५ हजार रुपये मिळायचे. त्यावरच आमचा उदर्निवाह चालायचा. काेराेनाने आमच्या पाेटावरच टाच आणली आहे. शासनाने तातडीने अनुदान देवून आधार द्यावा, अशी मागणी आहे.

गाेजरबाइ, कामगार