शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरच्या वापरासाठी आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST

जिल्ह्यात कोविड प्रादुर्भाव नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज, परिस्थिती नियंत्रणात लातूर : कोविड-१९ प्रादुर्भाव नियंत्रण आणि उपचारासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज आहे. ...

जिल्ह्यात कोविड प्रादुर्भाव नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज, परिस्थिती नियंत्रणात

लातूर : कोविड-१९ प्रादुर्भाव नियंत्रण आणि उपचारासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज आहे. खाजगी रुग्णालयाच्या सहभागातून बेडची संख्या वाढविली जाईल. मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असून, रेमडेसिविरच्या वापरासाठी आचारसंहिता करण्यात आली असून, येणाऱ्या काळात लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी दिली.

रुग्णसंख्येचा वाढता वेग यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. परंतु, प्रशासन, पोलीस, वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा विश्वास आला असल्याचे सांगत पालकमंत्री पत्रपरिषदेत म्हणाले, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून, मृत्यूचे प्रमाण १.७४ टक्के आहे.

येणाऱ्या २० एप्रिलपर्यंत रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशावेळी शहरातील दोनशे खाजगी रुग्णालयांनी बेडची संख्या वाढवावी. प्रत्येकाने किमान ५ बेड वाढवावेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत १५० बेड वाढविण्यात आले आहेत. एमआयटीसी संचलित रुग्णालयात कोविड सेवा सुरू करण्यास सांगितले आहे. तेथून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता आहे. जिल्ह्याला ३० मे. टन ऑक्सिजनची गरज आहे आणि आपली जिल्ह्याची साठवणूक क्षमता ५४ मे. टन आहे. ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर निर्बंध आहेत. तसेच आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटरही उपलब्ध आहेत.

रेमडेसिविरचा गरजेनुसार वापर...

रेमडेसिविर व अन्य औषधांचा आवश्यकतेनुसार पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी अनावश्यक वापर होत असल्याने तुटवडा निर्माण होऊन गरजूंना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेमडेसिविर कधी वापरावे, याची नियमावली तयार करण्यास सांगितली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयांना मागणीनुसार इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी सूचना केल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, संस्थात्मक विलगीकरण केंद्राची संख्या वाढविली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

लॉकडाऊनची अंमलबजावणी

सर्व घटकांना विश्वासात घेऊन लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्रशासनाला व पोलिसांना दिले आहेत. जनतेनेही त्यासाठी पुढाकार घ्यावा.