आवर्त नावाचा मेघ धन; धान्य वाढवेल, ३ जूननंतर कोरोनाचे समूळ उच्चाटन होईल : पंचांगकर्त्यांचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:16+5:302021-04-14T04:18:16+5:30
उदगीर : खरिपाचा स्वामी शुक्र असल्याने यंदा पाऊस चांगला होऊन धन-धान्याची वृद्धी होईल. ३ जूननंतर मंगळ कर्क राशीत आल्यानंतर ...
उदगीर : खरिपाचा स्वामी शुक्र असल्याने यंदा पाऊस चांगला होऊन धन-धान्याची वृद्धी होईल. ३ जूननंतर मंगळ कर्क राशीत आल्यानंतर कोरोनाचे भारतातून समूळ उच्चाटन होईल, असा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तविला आहे.
रोहिनी नक्षत्र तटावर पडले आहे. त्यामुळे पाऊस पुष्कळ पडून धन-धान्य समृद्धी होईल. १२ मार्चला रोहिणी नक्षत्रात मंगळ आल्यानंतर भारतात कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. ३ एप्रिलला मंगळ हा मृग नक्षत्रात आला आहे. मृग नक्षत्राचा स्वामी हा मंगळ आहे. मंगळ मृग नक्षत्रात आल्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. १३ एप्रिल २०२१ गुढीपाडव्या दिवशी मंगळ मिथुन राशीत प्रवेश करतो. हिंदुस्थानची मकर रास समजली जाते. त्यामुळे राशीनुसार मंगळ सहाव्या स्थानात म्हणजेच रिपू (शत्रू) स्थानात व रोगाच्या स्थानात राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रात त्याचा प्रादुर्भाव १७ मे २०२१ पर्यंत राहणार आहे. पुनर्वसू, नक्षत्राचा स्वामी गुरु असल्यामुळे या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. ३ जून २०२१ रोजी मंगळ कर्कराशीत येत असल्यामुळे हिंदुस्थानातून कोरोनाचे समूळ उच्चाटन होईल. देशात एकंदरित शांततेचे वातावरण निर्माण होईल, असा अंदाज हैदराबाद येथील प्रख्यात दत्तभक्त योगी डॉ. प्रमोद वाकनीस यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सरूरनगर येथील दत्तमंदिरात बोलताना व्यक्त केला. प्रारंभी आनंद व्यवहारे गुरुजी यांनी नवीन पंचांगांचे वाचन केले.