शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून नळेगावात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST

चाकूर ते वाढवणा रस्त्याची दुरवस्था लातूर : जिल्ह्यातील चाकूर ते वाढवणा पाटी या २० किलोमीटर अंतराच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात ...

चाकूर ते वाढवणा रस्त्याची दुरवस्था

लातूर : जिल्ह्यातील चाकूर ते वाढवणा पाटी या २० किलोमीटर अंतराच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. केवळ थातूरमातूर डागडुजी केली जात असल्याने सातत्याने हा रस्ता उखडतो. हा मार्ग दोन तालुक्यांना जोडणारा आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाढवणा, सुकणी, मन्ना उमरगा, एकुर्का रोड, आडोळवाडी, केसगीरवाडी, डांगेवाडी, खेर्डा, किनी, डाऊळ, हिप्परगा, डोंग्रज, राचन्नावाडी, संगाचीवाडी, शेळगाव, कलकोटी, बोथी, हणमंतवाडी आदी गावच्या ग्रामस्थ, वाहनधारकांतून होत आहे.

पैशाच्या कारणावरून हिप्परग्यात मारहाण

लातूर : विहीर पाडल्याचे पैसे मुलास का देत नाहीस या कारणावरून एकास मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना चवणहिप्परगा येथे घडली. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद अभंग संभाजी बिरादार (७२) यांना विहीर पाडल्याच्या पैशाच्या कारणावरून दिगंबर तुळशीराम बिरादार याच्यासह अन्य तिघांनी दगडाने मारून जखमी केले. शिवाय, जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.

हाळी हंडरगुळी येथील बसस्थानकाची दुरवस्था

लातूर : उदगीर तालुक्यातील नांदेड-बीदर राज्य मार्गावर असलेल्या हाळी हंडरगुळी येथील बसस्थानकाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. शौचालय आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. बसस्थानक परिसरात डांबरीकरण करण्यात न आल्याने सर्वत्र खडी असल्याचे दिसून येते. परिणामी, महामंडळ कर्मचाऱ्यांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

प्रकल्पाखालील गावांत सिंचनाचे क्षेत्र वाढले

लातूर : यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. परतीच्या पावसाने तर जिल्ह्याला झोडपून काढले. परिणामी, शेत-शिवारातील लघु, मध्यम आणि साठवण तलावातील जलसाठा यंदा वाढला. यातून प्रकल्पाखालील परिसरात सिंचनाचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. पाण्याचा अंदाज घेऊन अनेक शेतकऱ्यांनी यंदा रबीचा पेराही मोठ्या प्रमाणात घेतला आहे. यातून भविष्यात खरिपातील नुकसानाची भरपाई रबीतून मिळेल.